HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्र-राज्य सरकारमधील वाद आणखी पेटला, मेट्रोच्या जागेवर केंद्र सरकारच्या नावाचा लागला बोर्ड!

मुंबई | कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडच्या जमिनीवर अचानक दावा केल्यानंतर केंद्र सरकारने महाविकासआघाडी सरकारला आणखी एक धक्का दिला आहे. या परिसरात आता केंद्र सरकारकडून ही जागा आपल्या मालकीचे असल्याचा बोर्ड लावण्यात आला आहे. ही जागा मिठागाराची असून त्यावर केंद्र सरकारचा हक्क असल्याचा मजूकर या बोर्डवर लिहिला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कांजूरमार्गची जागा राज्य सरकारला मिळून द्यायचीच नाही, असा निश्चय केंद्र सरकारने बांधलेला यातुन दिसत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार हा संघर्ष आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

नेमकी काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने एकही रुपया न घेता ही जागा MMRDA ला दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, आता केंद्र सरकारने या जागेत मिठागार असल्याचे सांगत त्यावर आपला हक्क सांगितला आहे. केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि व्यापार मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकवणार !

News Desk

पोलीस पाटी व चिन्ह असलेले स्टिकर्स लावल्याचे आढळल्यास वाहनांवर होणार कारवाई

Aprna

‘भारतरत्नांनी’ पदाला साजेसं असंच बोलावं वागावं व लिहावं’, राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका  

News Desk