HW News Marathi
Covid-19

CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच ! | सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं धुमाकूळ घातला असल्यामुळे देशातील कोरोना परिस्थिती भयावह झाली होती. यामुळे केंद्र सरकारने उच्चस्तरीय बैठक घेऊन CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर ICSE बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. याचिकाकर्त्याने याचिका दाखल करत जर IIT, JEE आणि CLAT परीक्षा प्रत्यक्षात घेतल्या जाऊ शकतात तर १२वीच्या परीक्षा का घेतल्या जाऊ शकत नाहीत असा सवाल केला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने सदर याचिका फेटाळून केंद्र सरकारनं घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयात CBSE, ICSE बोर्डाच्या १२वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनाबाबतच्या निर्णयावरही आव्हान देण्यात आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळत CBSEआणि ICSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटलं आहे. तसेच परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचेही न्यायालयानं म्हटलं आहे. केंद्र सरकार आणि CBSEबोर्डाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करुन परीक्षा रद्द कऱण्याचा निर्णय घेतला असल्याचे न्यायालयाने नमूद केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मकरज’ची पुनरावृत्ती होणार? कुंभमेळ्यातून परतणाऱ्यांचा शोध सुरू

News Desk

स्वयंशिस्तीचे पालन केल्यामुळे राज्यातील ‘या’ गावात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

News Desk

चिंताजनक! राज्यात गेल्या २४ तासांत ४३,१८३ नव्या रुग्णांची नोंद

News Desk