HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्र्यांचे आजोबा-पणजोबाही वारीला जातात, वारीचा निर्णय सरकारने विचार करूनच घेतला

नाशिक | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही निर्बंध घालून वारीसाठी १० मानाच्या पालख्यांचे बसने घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे. मात्र, वारकऱ्यांकडून सरकारच्या या निर्णयावर ताशेरे ओढले जात आहेत. दहा पालख्यांनाच परवानगी दिली आहे. त्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी समर्थन केलं आहे. मंत्रिमंडळात असलेल्यांच्या घरातील आजोबा-पणजोबांपासून सगळे वारी करतात. त्यामुळे वारीचा निर्णय विचार करूनच घेतला आहे, असं सांगतानाच ज्यांना राजकारणच करायचं आहे, त्यांना रोखू शकत नाही, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना वारीबाबतच्या सरकारच्या भूमिकेचं समर्थन केलं. मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या आजोबा-पणजोबांपासून अनेकजण वारी करतात. पण कोरोना वाढू नये म्हणूनच सरकारने काही निर्णय घेतला आहे. लग्नात सुद्धा 50 लोकांना आपण परवानगी दिली आहे. विचार करूनच निर्णय घेतला आहे. तो प्रतिष्ठेचा विषय करू नये. ज्यांना राजकारण करायचं आहे. त्यांना रोखू शकत नाही, असं सांगतानाच वारीबाबत कुणी तरी निर्णय जाहीर करायचा होता. तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला आहे, असं भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळांचं सूचक विधान

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल भेट झाली. त्यावरही भुजबळांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पवार-प्रशांत किशोर भेटले. त्यामुळे निश्चितपणे त्यांच्यात काही तरी चर्चा झालीच असेल, असं सूचक विधान करून भुजबळांनी या भेटीचं गूढ अधिकच वाढवलं आहे.

आषाठी वारीसाठी १० मानाच्या पालख्यांना परवानगी, अजित पवारांनी जाहीर केला निर्णय

राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे अनेक सण उत्सव सुरु होताना दिसत आहेत. अशात आषाढी वारीला पालखी कशी न्यायची हा मोठा प्रश्न वारकऱ्यांसमोर उभा होता. यावर आता ठाकरे सरकारने निर्णय दिला आहे. आषाढी वारीसाठी १० मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे.

काल (११ जून) पुण्यात ते बोलत होते. दरम्यान, आषाढी वारीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने विचार करुन हे सांगतिलं आहे. त्यामुळे या वारीला १० मानाच्या पालख्यांना २० बसेस दिल्या जाणार आहेत. यावेळी कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं असणार आहे असं अजित पवारांनी सांगितलं आहे. तसेच, भाविकांसाठी मंदिर बंद राहणार असंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच, देहू आळंदी पालखीबरोबर १०० भाविकांना परवानगी देण्यात आली आहे.

१० मानाच्या पालख्या कोणत्या?

१- संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)

२- संत तुकाराम महाराज (देहू)

३- संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)

४- संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)

५- संत सोपान काका महाराज (सासवड)

६- संत नामदेव महाराज (पंढरपूर)

७- संत एकनाथ महाराज पैठण

८- रुक्मिणी माता (कौडानेपूर) अमरावती

९- संत निळोबाराय (पारनेर अहमदनगर)

१०- संत चांगटेश्वर महाराज (सासवड)

पायी जाण्यास मज्जाव, रिंगण-रथोत्सावाला अटींवर परवानगी

वारीला पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. पालखी पायी गेल्यास लोक उत्साहाच्या भरात पालखीभोवती गर्दी करतील. त्यामुळे कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळेच पायी जाण्यास देण्यात आली नाही, असं ते म्हणाले आहेत.

भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद

दरम्यान, भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ मानाच्या पालख्यांमधील वारकरीच मंदिरात जाऊ शकतील. रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे, असं सांगतानाच इतरांना परवानगी नाही. त्यामुळे कुणीही गर्दी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 ‘खासदारकी मागायला आलो नव्हतो’चंद्रकांत पाटलांना संभाजीराजेंचा घरचा आहेर…

News Desk

मुंडे भगिनींचे समर्थक पंकजा मुंडेंच्या भेटीला, काय होणार बैठकीत?

News Desk

शिवाजी पार्क नुतनीकरणाच्या प्रकल्पात आदित्य ठाकरे-राज ठाकरे आमनेसामने

News Desk