HW News Marathi
महाराष्ट्र

चाकण हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून २० जण ताब्यात

पुणे | चाकण हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात २० जणांना ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणासाठी चाकणमध्ये बंद पुकारला होता. या बंदा दरम्यान चाकणमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता

चाकणमध्ये ३० जुलै रोजी बंद पुकारण्यात आला होता. तेव्हा आंदोलकांनी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. चाकण हिंसाचारात मराठा आंदोलकांनी एसटी बसेसची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले केली होती.

या बंदमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना पहिल्यांदा अटक करण्यात आली. या हिंसाचार प्रकरणात चाकण येथील आसपासच्या गावांतील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचा यात समावेश असल्याचे सांगितले जाते. या हिंसाराचार प्रकरणी पोलिसांनी ४ ते ५ हजार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राजीनामा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मागितला पाहिजे, निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा  

News Desk

ED चे अधिकारी आता कमळ हातात घेण्याच्या तयारीत ?

News Desk

शिंवेंद्रराजे आणि माझ्या भेटीत काही काळबेरं नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया

News Desk
महाराष्ट्र

हो.. घोडेबाजार तर होणारच…..अजित पवार 

News Desk

– शिवसेना भाजपच्या नितीवर अजितदादांचा प्रहार

मुंबई महापालिकेतील वर्चस्वासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. ही बाब अपेक्षितच होती. त्यामुळे मुंबई महापालिकेत आगामी काळातही घोडेबाजार हा होणारचं असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. भाजप आणि शिवसेनेत एका सदस्स्याचेच अंतर आहे. त्यात महापौर हा भाजपचाच होईल असं वक्तव्य भाजप नेत्यांनी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेनं मनसेचे ६ नगरसेवक फोडले. हीच बाब आता भाजपकडून होण्याची दाट शक्यताही पवार यांनी व्यक्त केली. त्यामुळे आगामी काळा घोडेबाजार आणि फोडाफोडीचेच राजकार मुंबई महापालिकेत पहायला मिळालं तर आश्चर्य नको असेही ते म्हणाले.

यावेळी शिवसेनेवर पवार यांनी जोरदार टिका केली. भिती पोटी शिवसेना सत्ते आहे. सत्तेतून बाहेर पडले तर त्यांचे आमदार फुटण्याची भिती शिवसेनेला आहे. शिवसेनेची अवस्था “धरले तर चावते आणि सोडले तर पळते” अशी झाल्याचा टोला ही त्यांनी लगावला. नांदेड येथील निवडणुकीत शिवसेनेचा आमदार भाजपच्या मंचावर जाऊन प्रचार करतो. त्यांची तिकीटे वाटतो आणि आपल्याच पक्षाकडे पाठ फिरवतो. हे चित्र केविलवाणे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हयात असते तर आमदाराची अशी हिंमत झाली असती काय? असा प्रश्न पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

Related posts

“राऊतांनी उगाच मिठाचा खडा टाकू नये”, गृहमंत्र्याबद्दलच्या वक्तव्यावर अजित पवारांनी फटकारले

News Desk

धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती स्थिर

News Desk

नागपूर विधिमंडळ परिसर विस्तारीकरणासाठी प्रयत्नशील! – राहुल नार्वेकर

Aprna