HW News Marathi
महाराष्ट्र

Hw Exclusive |  चंद्रकांत पाटलांनी ‘या’ शब्दांत केली रश्मी वहिनींची स्तुती !

गौरी टिळेकर | भाजपचे दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? त्यांना इतिहासाचे उत्खनन करण्याची इतकीच आवड असेल तर पंचवीस वर्षांपूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ केल्याचे त्यांच्या लक्षात यायला हवे होते, असे म्हणत मिसेस मुख्यमंत्री अर्थात रश्मी ठाकरे यांनी ‘सामना’च्या संपादकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्याच (२ मार्च) अग्रलेखात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. तसेच, अग्रलेखात चंद्रकांत पाटलांना दादामियां अशी उपाधी दिली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (३ मार्च) पत्रकार परिषदेत सामनातील भाषा ही एकच आहे जी पितृभाषा आहे असे म्हटले होते. त्यावर मुंबईतील भाजपटे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी आमची एच.डब्ल्यू ची प्रतिनिधी गौरी टिळेकर यांनी संवाद साधला.

कालच्या (२ मार्च) सामनाच्या अग्रलेखातील अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरली ही रश्मी वहिनींची असूच शकत नाही असे त्यांनी म्हटले. तसेच, माझी रश्मी वहिनींनी विनंती आहे की जर तुम्ही नावापुरत्या संपादक झाल्या असाल तर त्यावर एक स्फुट लिहा की ही मी यात पडणार नाही आहे, हे सगळे लिहणारे संजय राऊत आहेत. कारण त्यांनी स्वत: ते आधी वाचले पाहिजे आणि मुळात कोणतीही स्त्री अशी भाषा वापरणार नाही. आणि रश्मी वहिनी अतिशय शालिन आणि नम्र आहेत. त्यामुळे त्या अशी भाषा कशी वापरु शकतात. आणि जर सामनाची भाषा जर अशी असेल तर ती रश्मी वहिनींची भाषा नको करु, असे स्पष्ट मत चंद्रकांत पाटील यांनी एच.डब्ल्यूशी बाचतीत करताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकार कधी स्थापन होणार हे  भाजप-शिवसेनेलाच विचारा !

News Desk

शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा मोठी घसरण, सेन्सेक्स १५२४ अंकांनी कोसळला

swarit

’25 जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता तर 11 जिल्ह्यांमध्ये नियम कायम’, आरोग्य मंत्र्यांची घोषणा!

News Desk