HW News Marathi
महाराष्ट्र

“नारायण राणे नारळासारखे आहेत”- चंद्रकांत पाटील

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमनातरी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात टीका केल्याने राजकीय वातावरण पेटून उठलं आहे. शिवसेनेने नारायण राणेंच्या अटकेसाठी तक्रार नोंदवली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणेंच्या या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. त्यांनी ट्विट करत त्यांचं समर्थन दर्शवलं आहे.

नारायण राणे आक्रमक म्हणूनच ओळखले जातात

“केंद्रीय मंत्री नारायण राणे आक्रमक म्हणूनच ओळखले जातात. ती त्यांची शैली आहे. प्रत्येकाची एक शैली असतेच. मी शैलीचं समर्थन करत नाही, पण त्यासाठी थेट अटक कितपत योग्य ठरेल? राणेसाहेब केंद्रीय मंत्री आहेत, हे विसरून कसं चालेल? सरकार, प्रशासनाने याविषयी त्यांच्याशी चर्चा करावी”,असं ट्विट त्यांनी केलं आहे.

आक्रमक शैलीत उद्धव ठाकरेंनीही भाषणं केली

आक्रमक शैलीत उद्धव ठाकरेंनीही भाषणं केली आहेत. दसरा मेळाव्याची भाषणं काढून पाहा. त्यात वादग्रस्त विधानं आहेत. नीलम गोऱ्हे सभापती असूनही राजकीय वक्तव्यं करतात. त्यांना विचारा की, सभापतीपदाचा राजीनामा दिलाय का? त्यामुळे सामंजस्याने मार्ग काढायला हवा, असं माझं मत आहे.

नारायण राणे नारळासारखे आहेत

“नारायण राणे नारळासारखे आहेत. वरून कठोर आणि आतून मऊ मनाचे. त्यांच्या एका वक्तव्यावरुन थेट अटक? त्यांना अटक केल्यास राज्यात काय पडसाद उमटतील, याचा विचार सरकारने केलाय का? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नांदावी ही जबाबदारी लक्षात घेऊन राज्य सरकार निर्णय घेईल, अशी आशा करतो”, असं ट्विट करत चंद्रकांत पाटलांनी त्यांचं मत मांडलं आहे.

कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू

चंद्रकांत पाटील यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, ““भाजप नेते नारायण राणे यांची बोलण्याची स्टाईल आहे. अशा एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक? हे काय चाललंय? प्रत्येक शिवसैनिकाविरोधात खंडणी, बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहे. त्यावेळी तत्परता का नाही दाखवली? केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू आहे. त्यावरुन जे काय होईल त्याला जबाबदार सत्ताधारी असतील” अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं. तर, नारायण राणेंना अटक करुनच दाखवा, तुमच्यात हिंमत नाही, असं म्हणत भाजप नेते प्रमोद जठार यांनी ठाकरे सरकारला पुन्हा ललकारलं आहे.

हा राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग आहे

“हा राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग आहे. नारायण राणेंची बोलण्याची स्टाईल आहे. अशा एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक? हे काय चाललंय? प्रत्येक शिवसैनिकाविरोधात खंडणी, बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहे. त्यावेळी तत्परता का नाही? केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू आहे. त्यावरुन जे काय होईल त्याला जबाबदार सत्ताधारी असतील” असा इशारा चंद्रकांतदादांनी दिला आहे.

राणे ‘मारतो’ म्हणाले नाहीत, ‘मारणार आहे

“राणे ‘मारतो’ म्हणाले नाहीत, ‘मारणार आहे’ ही धमकी असते, न्यायालयात ही गोष्ट टिकणारच नाही. राणे तसे म्हणालेच नाहीत. ‘मी असतो तर’ असं ते म्हणाल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. “हा राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग आहे. नारायण राणेंची बोलण्याची स्टाईल आहे. अशा एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक? हे काय चाललंय? प्रत्येक शिवसैनिकाविरोधात खंडणी, बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहे. त्यावेळी तत्परता का नाही? केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू आहे. त्यावरुन जे काय होईल त्याला जबाबदार सत्ताधारी असतील” असा इशारा चंद्रकांतदादांनी दिला आहे.

जन आशिर्वाद यात्रा निघणार

जन आशिर्वाद यात्रा निघणार. न्यायालयात हे दोन सेकंदात उडणार. हे सगळं भीतीपोटी झालं आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात राणे साहेब जात आहेत. कोकणात शिवसेनेचं वर्चस्वाला हादरा बसत आहे. नारायण राणेंना अटक होईल असं वाटत नाही. न्यायालय योग्य निर्णय देईल. यात्रा सुरु राहील. दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले तर ही जबाबदारी प्रशासनाची. एखाद्या वाक्यावरुन टोक गाठायचं असेल तर शासनाच्या मनात असंतोष निर्माण करण्याचं आहे हे दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात नोटाबदलीच्या रॅकेटमधील 5 पोलिसांवर बडतर्फीची कारवाई

News Desk

भीषण ! महाराष्ट्रातील २६ धरणे कोरडी

News Desk

सरकारचा SEBC उमेदवारांना दिलासा देणारा निर्णय संपूर्णपणे ‘फसवा’, पडळकरांची टीका

News Desk