HW News Marathi
Covid-19

प्रताप सरनाईकांच्या पत्रावर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही हेच सांगत होतो !

मुंबई। भाजपा सोबतची युती तुटली जरी असली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी चांगले नातेसंबंध टिकून आहेत . ते अजून तुटण्याच्या आधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल , अस पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यांना लिहिलं आहे . यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे . आमदार प्रताप सरनाईक जे आता सांगत आहेत , तेच तर आम्ही १८ महिन्यांपूर्वी सांगत होतो.पण तेव्हा तुम्ही ऐकलं नाही,चंद्रकांत पाटील म्हणाले.

भारतीय जनता पार्टी सोबत पुन्हा युती करायला हवी. असं सरनाईक यांनी म्हटलंय आता मी याबद्दल सकारात्मक बोललो तर लगेच सामनामध्ये अग्रलेख येईल. यांच्याकडे सत्ता नसल्याने पोटात दुखत असल्याची देखील करण्यात येईल. मात्र सरनाईक यांनी त्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले म्हणून आता यावर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा त्यानंतर आमचे वरिष्ठ नेते देखील विचार करतील असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी पाटील बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेची देखील आठवण करून द्यायला विसरले नाही. अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन मी करणार नाही, ही बाळासाहेबांची भूमिका होती आणि याच भूमिकेसाठी त्यांनी आयुष्यभर ज्यांच्या विरोधात संघर्ष केला, त्यांच्या सोबत उद्धव ठाकरेंनी आपली चूल मांडली अशी टीका देखील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर व मालमत्तांवर सक्तवसुली संचलनालयांन पुस्तकावर छापे टाकले त्यामुळे त्यांनी भाजपासोबत जाण्याचा आग्रह धरला आहे का, असा प्रश्न पाटलांना विचारण्यात आला त्यावर त्यांनी म्हटलंय त्यांना युती व्हावी असं मनापासून वाटत असाव तसेच शिवसैनिकांची आणि पक्षाच्या अनेक नेत्यांना देखील तसं वाटत असावं असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील, राज्य सरकारचा निर्णय

News Desk

भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे निधन

News Desk

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून डॉक्टरांच्या सुरक्षेचे आश्वासन

News Desk