HW News Marathi
महाराष्ट्र

पार्थ पवार यांची ‘सत्यमेव जयते’कडे वाटचाल सुरू, चंद्रकांत पाटील यांचे मोठे वक्तव्य

पुणे |सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदचा इशारा मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.त्यातच आरक्षणाच्या मुद्दयावरून बीड जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. मात्र या घटनेवर पार्थ पवार यांनी केलेल्या आक्रमक ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पार्थ यांना पाठिंबा दिला आहे. तसेच, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे.

पुण्यात खासदार गिरीश बापट व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी अभियानाला आज (१ ऑक्टोबर) सुरूवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, पार्थ पवार यांची ‘सत्यमेव जयते’कडे वाटचाल सुरू आहे. पण याचवेळी पार्थ यांच्या भाजप प्रवेशावर ‘असा कुठलाही प्रस्ताव अजूनतरी आलेला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मराठा आरक्षणाचा अध्यादेश केंद्राला काढता येणे कदापि शक्य नाही. आरक्षण हा राज्याचा विषय आहे. ही बाब इतकी वर्ष राजकारणात सक्रिय असणाऱ्या शरद पवारांना माहिती नाही का? असा सवाल उपस्थित करत पाटील यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांचं मौन अस्वस्थ करणारं!

News Desk

मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊन वाढवल्यासंदर्भात अधिसूचना जाहीर

News Desk

आत्महत्या करणारे 26 % शेतकरी मराठा समाजाचे

News Desk