HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचं मौन अस्वस्थ करणारं!

मुंबई | उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर काही तासातच अनिल देशमुखांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, त्या निर्णयानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा हे अपेक्षित होते. तशा प्रकारे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिल्याचं माध्यमांच्या द्वारे आमच्या लक्षात आलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांचं मौन अस्वस्थ करणारं

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेतून त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. इतक्या भयावह घटना महाराष्ट्रात झाल्या, कधी नव्हे अशा प्रकारचे आरोप मंत्र्यांपासून पोलिसांपर्यंत लागले. पण राज्याचे मुख्यमंत्री यासंदर्भात चकार शब्दही का बोलत नाहीत. अद्यापही त्यांनी कुठली प्रतिक्रिया का दिली नाही. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांचं मौन अस्वस्थ करणारं आहे. किमान अशा परिस्थितीत तरी त्यांची प्रतिक्रिया यायला हवी होती. त्यांची शेवटची प्रतिक्रिया वाझे काय लादेन आहे का, अशी होती, या प्रतिक्रियेनंतर इतक्या गोष्टी घडल्या. तो लादेन की दाऊद आहे मला माहीत नाही. पण तो नेमका काय आहे हे समोर आल्यानंतरही मुख्यमंत्री का बोलत नाही, असा माझा सवाल आहे. मुख्यमंत्र्यांनी चूक झाली, तर आम्ही ती सुधारू, असं जनतेला सांगितलं पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

देशमुखांचा राजीनामा पवार साहेबांनी तेव्हाच घ्यायला हवा होता

अनिल देशमुखांचा राजीनामा देण्याकरिता उशीर झाला. आमची अपेक्षा अशी होती की, इतके गंभीर आरोप लागल्यानंतर आणि रश्मी शुक्लांचा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर तात्काळ अनिल देशमुख यांचा राजीनामा राष्ट्रवादी पक्षाने आणि पवार साहेबांनी घ्यायला हवा होता. परंतु त्याकरिता उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागली. अशा गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून समोर यायला पाहिजेत, पण तशा पद्धतीने आलेल्या नाहीत, असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

या सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे का?

नैतिकता कधीही आठवली तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. या सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे का, असा प्रश्नच मुख्यमंत्र्यांना विचारावा लागेल. मी पुराव्यांच्या आधारे माझी भूमिका मांडत होतो, पण मला उत्तर देणारे टोलवाटोलवी करत होते. मला उत्तर देणारे माझीच चौकशी करू, अशा वल्गना देत होते. पुराव्यांनिशी मी ज्या गोष्टी मांडत होतो ते आता न्यायालयानंही स्वीकारल्याचं मला समाधान आहे. सचिन वाझेंचे बॉस अजून सापडलेले नाहीत. सचिन वाझेंचा हँडलर शोधणे गरजेचं आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सरकारला दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या ‘मेव्या’चा ‘हेवा’ , चंद्रपूरमधील दारुबंदी उठवल्यानंतर पडळकरांचा टोला

News Desk

“…तर जावेद अख्तरना तालिबाननं चौकात फटके मारले असते”, सुधीर मुनगंटीवारांचा जावेद अख्तरांवर हल्ला

News Desk

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटलांची फेरनिवड, लोढांचे मुंबई अध्यक्षपदही कायम

swarit