HW News Marathi
महाराष्ट्र

आज दिवसभर अशाच बातम्या येतील !

मुंबई | राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकास आघाडातील अनेक नेत्यांची नाराजी समोर आली. खातेवाटपाचा आणि मंत्रिपदाचा गुंता सुटता सुटत नव्हता तितक्यातच अब्दुल सतार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत शिवसेनेला धक्का दिला आहे. अब्दुल सत्तारांनी आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला होता.

शिवसेनेच्या तिकीटावर सिल्लोड मतदारसंघातून ते निवडूनही आले होते. मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशा अपेक्षेत असणाऱ्या सतार यांना राज्यमंत्रिपद दिले पण कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने खातेवाटप जाहीर होण्याआधीच त्यांनी पदभार सोडला. सत्तारांच्या राजीनाम्याची बातमी हाती येताच भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीत मोठी फूट पडणार असल्याचे भाकीत केले. “आज दिवसभर अशाच बातम्या येतील”, असं वक्तव्य भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करत आघाडीला टोमणा मारला आहे.

पाटलांच्या या विधानात भर करत भाजपा नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनीही महाविकास आघाडीत असलेली नाराजी आता समोर येत असल्याचे म्हटले. आश्चर्याची बाब म्हणजे महाविकास आघाडीतील नाराज आमदारांशी भाजपा संवाद साधत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सतार यांच्या राजीनाम्याबद्दल काहीही कल्पना नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पवार, ठाकरे आणि थोरात हे झारीतील शुक्राचार्य”, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप!

News Desk

सर्वोच्च न्यायालयाचा जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा आदेश

Gauri Tilekar

कांजूरमार्ग कारशेडचे काम थांबवण्याचे भाजपचे कटकारस्थान – नवाब मलिक

News Desk