HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्राचा राज्यांना लस देताना आखडता हात, राजेश टोपेंचा गंभीर आरोप

जालना | राज्याला लसी पुरवण्यात केंद्र हात आखडता घेत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रावर गंभीर आरोप केला आहे.लस उपलब्ध होत नसल्यानेच राज्यातील अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद असल्याचंही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

१८ ते ४४ वयोगटातील नागरीकांना १ मे पासून लसीकरण सुरु करणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते जालन्यात आज (२५ एप्रिल) पत्रकारांशी बोलत होते. राज्यात १ मे पासून जरी लसीकरणाला आपण सुरुवात करणार असलो तरी राज्यात सध्या तेवढा लसींचा साठा उपलब्ध नाही,मात्र मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती यावर पर्याय शोधत असल्याच टोपे यांनी म्हटलं आहे.

राज्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला असून केंद्राने दररोज ६ ते ७ लाख लसी द्याव्या तसेच आठवडाभर पुरेल एवढा साठा शिल्लक द्यावा अशीही मागणी त्यांनी केली.सध्या राज्यात रेमडेसिवीर,ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय हा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्राच्या धर्तीवर ग्लोबल टेंडर काढण्याची प्रक्रिया अर्थ सचिवांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण करत असून यातून ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा दूर होईल अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.

राज्यात ४५ वर्षांवरील लोकांना गतीने लसीकरण करण्यासाठी केंद्राने ८ लाख दररोज लसी देण्याची मागणी केली आहे मात्र केंद्राने हात आखडता घेतल्याने राज्यातील अनेक ठिकाणचं लसीकरण बंद आहे असा आरोप देखील टोपे यांनी केला आहे. सध्या राज्यात लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध लावलेले आहेत.त्यामुळे हा लॉकडाऊन नाही असं नाही असं सांगत विनाकारन फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे.

केंद्राने महाराष्ट्राला दिल्या जाणाऱ्या रेमडेसिवीरच्या कोट्यात वाढ केली असून येणाऱ्या १० दिवसांत साडेचार लाखांच्या आसपास रेमडेसिवीर राज्याला मिळणार आहे.केंद्राच्या या निर्णयामुळे राज्याला नक्कीच आधार मिळणार असल्याच ते म्हणाले आहेत.

राज्याला ऑक्सिजन वाहतुकीसाठी गरजेचे असलेले टँकर वायुसेनेच्या विमानाने येत असून गुजरात मधून ऑक्सिजन भरल्यानंतर हे टँकर बाय रोड येतील अशी माहिती टोपे यांनी दिली. राज्यात सध्या ऑक्सिजनची स्थिती स्थिर असून रुग्ण वाढतील त्याप्रमाणे मागणी वाढत जाईल,तसा तोडगा काढत राहू असा विश्वास देखील टोपे यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर मला राऊतांनी जोड्याने मारावे! – किरीट सोमय्या

Aprna

सगळंच पुन्हा बंद करण्याची वेळ आणू नका!

News Desk

“मुन्नाभाई सुपरहिट झाला तर तुम्ही फ्लॉप होणार,” नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Aprna