HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांनी शतक मारावं पण शतक मारताना आमच्या लेकराबाळांना मारू नका – सदाभाऊ खोत

सातारा | ‘राज्यात यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांनी उभी केलेल्या सहकार चळवळीची मूहुर्तमेढ खाली पाडण्याचे काम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली’, असा गंभीर आरोप रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केला आहे. साताऱ्यातील जळगावमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलत असताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

शरद पवार हे राजकारणाच्या पटलावरील बुद्धिमान आणि चांगला माणूस असून त्यांनी शतक मारावं पण शतक मारताना आमच्या लेकराबाळांना मारू नका’ असा सणसणीत टोला देखील सदाभाऊ खोत त्यांनी यावेळी लगावला आहे. सातत्याने खोत शरद पवारांना टोला लगावत असुन राष्ट्रवादी आता काय उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

इतकंच नाही तर, यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विकेल ते पिकले या घोषणेची देखील खिल्ली उडवली. ‘राज्यात विजेचा आणि उसाच्या FRP चा प्रश्न ऐरणीवर आल्याने येणाऱ्या अधिवेशनात सरकायला सभागृहात सळोकीपळो करून सोडणार आहोत. त्यासोबत शेतकऱ्यांच्या घरगुती आणि शेती पंपाची वीज कनेक्शन खंडीत करायला आलात तर हातात दांडकी घेऊन उभं राहणार असल्याचा इशाराच सदाभाऊ खोत यांनी सरकारला आणि महावितरण कंपनीला दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संविधानाच्या रक्षणासाठी स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे पुन्हा लढा द्यावा लागेल | खा. अशोक चव्हाण

Adil

TRP घोटाळा – रिपब्लिक चॅनलच्या ३ अधिकाऱ्यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी

News Desk

Maratha Reservation | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा पांडुरंगाचा आशीर्वाद !

News Desk