HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार नाराज असतील तर हे महाराष्ट्राचं मोठं नुकसान!

कोल्हापूर | मराठा आरक्षणासाठी मराठा सकल समाजाशी बातचीत करण्यासाठी आज (२९ जून) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरात गेले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवरुन महाविकासआघाडी सरकारवर ताशेरे ओढले. इतकंच नाही तर थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरही टीका केली आहे. पत्रकारांनी चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारला की, कोविड संदर्भात सध्या जो संभ्रम सुरु आहे त्यावरुन शरद पवार नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘पवार साहेब जर नाराज असतील तर ती नाराजी व्यक्त करण्यासाठी उशीर करत आहेत. महाराष्ट्राचं आर्थिक, वैद्यकीय वाटोळं झालं की मग ते नाराजी व्यक्त करतात’, असं पाटील म्हणाले आहेत.

पुढे ते असंही म्हणाले की, ‘माझी पवारांना विनंती आहे की, त्यांनी या सरकारमध्ये मोठी भूमिका बजावायला हवी ती त्यांनी सरकारस्थापन होऊन २ वर्ष झाली पण ती भूमिका बजावली नाही. एक अंकुश म्हणून जी भूमिका वठवायला हवी ती केली नाही. हे बरोबर चाललं नाही, काय धरसोड सुरु आहे? यातुन आर्थिक नुकसान झालं, वैद्यकिय नुकसान झालं. त्यामुळे आज जर पवार नाराज असतील तर महाराष्ट्राचं खुप नुकसान झालं’, अशी खंत आणि टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ST कर्मचाऱ्यांच्या पाठिशी, चुकीच्या नेतृत्वाच्या नाही! – शरद पवार

Aprna

आधी शिवरायांचा अपमान,आता श्रीपाद छिंदमचा नवा कारनामा!

News Desk

हुकमाची पानं मोदींच्या हातात असतील तर तुमची गरजच काय, दरेकरांचा राऊतांना टोला

News Desk