HW News Marathi
महाराष्ट्र

ST कर्मचाऱ्यांच्या पाठिशी, चुकीच्या नेतृत्वाच्या नाही! – शरद पवार

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणा न झाल्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आज (८ एप्रिल) ‘सिल्व्हर ओक’ दगड आणि चप्पलफेक आंदोलन केले आहे. “एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी, परंतु, चुकीच्या नेतृत्वाच्या पाठिशी नाही,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रावर दिली आहे. 

शरद पवार म्हणाले, “एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी, परंतु, चुकीच्या नेतृत्वाच्या पाठिशी नाही. चुकीचा रस्ता जर कोणी दाखवत असेल, तर त्याला विरोध करणे ही आपली जबाबदारी आहे. गेल्या ५० वर्षात एसटी कर्मचाऱ्यांचे एकही अधिवेशन चुकले नाही.  नेता शहाणा नसल्याने कार्यकर्त्यांचे नुकसान होते. चुकीचा रस्ता दाखवला, आणि आज त्याचे दुष्परिणाम पहायला मिळाले. टोकाची भूमिका घेणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही. आपण नेहमीच एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजुने होतो. संकट आले तरी आपण सगळे एक आहोत. एसटी कर्मचारी कारण नसताना घरदार सोडून बाहेर राहिले. अन् आर्थिक संकटात सापडले. ज्यांनी परिस्थिती निर्माण केली तेच आंदोलनाला जबाबदार आहेत.”

 शरद पवारांच्या निवसस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनकर्त्यांवर महाविकासआघाडीच्या सर्व नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या प्रकारसंदर्भात शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे.  तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आदी नेते मंडळांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समीर वानखेडेंच्या सत्कारावर आक्षेप; राज्य सरकारकडे कारवाईची मागणी

News Desk

महाविकास आघाडी सरकार शेतकरी विधेयक आणि सुधारणा विधेयक राज्यात लागू करणार नाही – अजित पवार

News Desk

हिवाळी अधिवेशनच्या कालावधीवरून फडणवीस नाराज; म्हणाले… सरकारला रस नाही!

News Desk