HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेचे सगळेच ‘संजय’ बेशिस्त!, चंद्रकांत पाटलांचा घणाघात

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना आरोग्य यंत्रणा कमी पडण्यास सुरुवात झाली आहे. रेमडेसिवीर, ऑक्सिजन, रुग्णांना बेड्स कमी पडत आहेत. याच दरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. विरोधी पक्षाकडून करण्यात येणाऱ्या आरोपांनंतर सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गंभीर टीका केली होती. मला कोरोनाचे जंतू मिळाले असते तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते असे वक्तव्य गायकवाड यांनी केले. यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, वायफळ बडबड न करता महाराष्ट्राच्या हिताचा विचार करावा. शिवसेनेचे सगळेच ‘संजय’ बेशिस्त आहेत, यात आता कसळीही शंका उरली नाही. आधी राऊत, नंतर राठोड आणि आता गायकवाड.

महाविकास आघाडी सरकारच्या बेजबाबदारपणामुळे राज्यात मृत्यूतांडव सुरू आहे.

मात्र, शिवसेनेचे बुलढाण्याचे बेशिस्त आमदार संजय गायकवाड या कठीण काळात सुद्धा आपली पातळी सोडताना दिसत आहेत. हे तेच बोलघेवडे कायकवाड आहेत ज्यांच्यावर अश्लील वक्तव्याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली होती. राजकारण हे राजकारणासारखं असावं. अपशब्द वापरणं, नेत्यांना चुकीचं नाव घेऊन संबोधणं, हे आमच्या राजकारणात बसत नाही.

मात्र, आपली राजकीय पातळी सोडून जर भाजपा नेत्यांवर पुन्हा टीका केली तर मोबदल्यात तुम्हाला चपराक मिळेल, एवढं लक्षात असावं. टीका करण्यापेक्षा लसीकरणावर भर द्या. राज्य संकटात आहे, त्यावर तोडगा काढा असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. यावर आता पुन्हा शिवसेनेकडून काही प्रत्युत्तर येणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

 

फडणवीसांवर आणि भाजपवर टिका करताना संजय गायकवाड काय म्हणाले होते?

यावेळी बोलताना म्हणाले की ,भाजपच्या लोकांचे नीच राजकारण महाराष्ट्र उभ्या डोळ्याने पाहतोय,देवेंद्र फडणवीस,प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील. हा कोरोना कोण कोणत्या पक्षाचा आहे,हा कोरोना राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता आहे का हे पाहुन येत नाही, तर हा कोरोना प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला वीळखा घालत आहे. भाजपाने हे विसरु नये त्यांच्या १०५ आमदाराना देखील महाराष्ट्रातील जनतेने मतदान केले आहे, त्यांचे २० खासदार देखील महाराष्ट्राने निवडून दिले आहे, अशावेळी केंद्रांकडून राज्यातील वॅक्सीन कंपन्यांना सांगितलं जात की तुम्ही महाराष्ट्राला लस, तसेच रेमडिसिवर देऊ नका. राज्याने ऑक्सीजनची देखील मागणी केली तरी केंद्र सरकार देत नाही.

५०,००० इंजेक्शन भाजपा कार्यालयातून गुजरात मध्ये फुकट दिल्या जातात, महाराष्ट्रात लोक तडफडतात, अशा प्रकारचे नीच आणि गली गलिच्छ राजकारण भाजपा सरकार करत आहे, हे या जगामध्ये,या देशामध्ये कोणीच केल नाही. आज त्यांना बांग्लादेश, पाकिस्तान, नेपाळल दयायला वॅक्सीन आहे, इंजेक्शन आहे, मग महाराष्ट्र काय ह्या सर्वांपेक्षा गया-गुजरा आहे का ? की आपल्या लोकांना देऊ नये म्हणून ही राजकारण करायची वेळ आहे का,? अशावेळी त्या मोदी सरकारला आणि फडणवीसांना लाज वाटायला पाहिजे की तुम्ही राजकारण कुठे करता. मला जर कोरोनाचे जंतु सापडले असते तर मी त्या फडणवीसांच्या तोंडात जावून कोंबले असते,असे गायकवाड म्हणाले.

पुढे ते असही म्हणाले की, इतका तिरस्कार ह्या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, आणि म्हणून ह्या लोकांनी राजकारण न करता लोकांना मदत करावी.पहिले हा महाराष्ट्र जगला पाहिजे,माणूस जगला पाहिजे नंतर तुमचे राजकारण आहे. अरे माणसच मरतील तर तुम्हाला शिक्के कोण मारणार आहे, कोण मतदान करेल तुम्हाला, हे लक्षात घ्या आणि नंतर तुमचे गलिच्छ राजकारण करा…अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या राजकारणावर ताशेरे ओढले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील पूरस्थितीची खासदार सुप्रिया सुळेंनी दिली अमित शहांना माहिती….!

Ruchita Chowdhary

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्याच मुंब्रा रेतीबंदर परिसरात आणखी एक मृतदेह सापडला

News Desk

“तुमच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे”, मुनगंटीवारांचे मोठे विधान

News Desk