HW News Marathi
महाराष्ट्र

म्हणून कदाचित राज्यपालांनी राज ठाकरेंना शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला असावा, चंद्रकांत पाटलांचा टोला

सांगली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात एकहाती भगवा फडकला पाहिजे असे म्हटले. त्यावरुन चर्चांना सुरुवात झाली. यावर विरोधी पक्ष नेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. पक्ष वाढवण्यासाठी भगवा एकहाती फडकवा असं बोलणं गैर नाही, सगळेच आपापला पक्ष वाढवत असतात. पण आम्ही प्रत्यक्षात ती कृती करून दाखवतो अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही, शरद पवार घराबाहेर पडतात असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

शरद पवार राज्य चालवतायेत, उद्धव ठाकरे ना कधी प्रवास करतात, ना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रश्न सोडवतात, मंदिरे बंद असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार रखडले, देवस्थानाकडून सुरु असणारे सामाजिक कामे थांबली, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस लोकांना बाहेर दिसतात, म्हणून कदाचित राज्यपालांनी राज ठाकरेंना शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला असावा असा चिमटा त्यांनी उद्धव ठाकरेंना काढला आहे.

तसेच ही वस्तूस्थिती आहे की, मी इथं खुर्चीत बसतो, तुम्ही राज्य सांभाळण्याचं कंत्राट घ्या असं उद्धव ठाकरे शरद पवारांना म्हणाले असतील, तसा त्यांच्यात करार झाला असावा असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. त्याचसोबत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेवर पाटील यांनी उत्तर दिलं, राज ठाकरे खूपच स्पष्ट शब्दात बोलतात असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी राहुल पाटील, उपाध्यक्षपदी जयवंतराव शिंपी यांची निवड

News Desk

अनिल देशमुखांवर परमबीर सिंग यांनी केलेल्या ‘त्या’ आरोपावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

News Desk

मुंबईवर अद्यापही मुसळधार पावसाचं सावट, आकाशात काळ्या ढगांची गर्दी

News Desk