HW News Marathi
महाराष्ट्र

सर्वांसाठी लोकल सुरु करायची असल्यास गर्दीचे विभाजन करावे लागणार, रेल्वेचे सरकारला उत्तर

मुंबई | मुंबईतील सर्वसामान्यांनाही लोकलने प्रवासाची परवानगी देण्यात यावी, यासाठी अखेर काल (२८ ऑक्टोबर) राज्य सरकारने यासंदर्भात रेल्वेला पत्र पाठवले होते. राज्य सरकारच्या प्रस्तावाल मध्य व पश्चिम रेल्वेने उत्तर दिले असून गर्दीच्या विभाजनासाठी तंत्रज्ञानातून उपाय शोधण्याचा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेने म्हटले आहे की, कोरोनाच्या आधी प्रत्येक दिवसाला ३५ लाख प्रवासी हे पश्चिम रेल्वेवर प्रवास करायचे, मात्र आता एका लोकलमध्ये सातशे प्रवाशी यानुसार दिवसाला ९.६ लाख प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.

यामुळे सर्वांसाठी लोकल सुरू करायचे असल्यास आधी तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दीचे विभाजन करण्यासाठी एखादा उपाय शोधावा, ज्याप्रमाणे पश्चिम बंगाल राज्यसरकारने शोधला आहे त्याप्रमाणे, महाराष्ट्र सरकार देखील विचार करत आहे, असे आधी झालेल्या बैठकीत सांगण्यात आले होते. या तांत्रिक रुपयासाठी जी मदत लागेल ती करण्यास रेल्वे तयार आहे, असे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

तसेच सरकारने प्रत्येक तासाला एक लेडीज स्पेशल चालवण्याचे प्रस्तावात नमूद केले होते. मात्र आधीपासून सर्व लेडीज स्पेशल लोकल सुरू असून प्रत्येक लोकलमध्ये २३ टक्के जागा या लेडीज प्रवाशांसाठी राखीव आहेत. त्यामुळे प्रत्येक तासाला लेडीज स्पेशल चालवल्यास स्टेशनवर महिला प्रवासी वाट बघत उभे राहतील तसेच पुरुष प्रवाशांसाठी लोकलच्या फेऱ्या कमी होतील. यामुळे स्थानकावर गर्दी वाढेल, असे पश्चिम व मध्य रेल्वेने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हळूहळू संजय राऊत खरं बोलायला लागलेत पण…”, आशिष शेलारांचा टोला

News Desk

“पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही, सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?”

News Desk

दुष्काळासाठी ३१ ऑक्टोबरनंतर कोणता मुहुर्त आहे ? | जयंतराव पाटील

swarit