HW News Marathi
देश / विदेश

केंद्राने कांद्याच्या निर्यातीवर आणली बंदी, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ!

नवी दिल्ली | राज्यात आणि देशात सध्या आर्थिक स्थिती बिघडली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळत नाही आहे. अशात केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कांद्यांच्या किमतीत वाढ होत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. कांदा उत्पादन शेतकऱ्यांच्या अडचणीत त्यामुळे वाढ झाली आहे. कांदा निर्यातीवर कधीपर्यंत बंदी राहील, हे अद्याप केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले नाही.

कांद्याने ३ हजारांचा टप्पा ओलांडल्याने केंद्र सरकारने बाजार भावावर अंकुश लावण्यासाठी काल (१४ सप्टेंबर) कांद्यावरील निर्यात बंदीचा निर्णय वाणिज्य मंत्रालयाचे महासंचालक अमित यादव यांनी जाहीर केला. गेल्या पंधरा दिवसांमध्ये कांद्याच्या दरामध्ये ४५ टक्क्याने वाढ झाल्याने केंद्र सरकार कांदा निर्यात बंदीचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मंगळयाना’नंतर आता इस्रोची ‘शुक्रा’वर जाण्याची तयारी

News Desk

नवे केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लडाख यांच्या बद्दलेल्या सीमारेषाचा नकाशा

News Desk

जाती धर्म भेद विसरून छत्रपती शिवरायांचे मावळे व्हा | रामदास आठवले

News Desk