HW News Marathi
महाराष्ट्र

आगामी निवडणुकांबाबत चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान, युतीबद्दल म्हणाले…!

बुलडाणा। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमुळे भाजप आणि शिवसेनेत संबंध कमालीचे ताणले गेले होते. त्यामुळे ‘आता कुणी पायघड्या घातल्या तरीही कोणाबरोबरही युती करणार नाही, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पुन्हा एकदा युतीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी यांनी पुन्हा एकदा स्वबळाची भाषा करत शिवसेनेवर निशाणास साधला.

जरी कुणी पायघड्या घातल्या तरी भाजप आता स्वतंत्ररित्या आगामी निवडणुका लढवणार

आता कुठल्याही परिस्थितीत युती करणार नाही. जरी कुणी पायघड्या घातल्या तरी भाजप आता स्वतंत्ररित्या आगामी निवडणुका लढवणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.तसंच, मागच्या निवडणुकीत आम्ही युती केली होती. पण, त्यानंतर शिवसेनेनं विश्वासघात करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली, त्यामुळे भाजपची फसवणूक झाली, असंही पाटील म्हणाले.

इम्पेरिकल डाटा तात्काळ जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून

दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आमनेसामने आले.यावेळी फडणवीस म्हणाले की, ‘इम्पेरिकल डाटा तात्काळ जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून मागासवर्ग आयोगाला द्यावे अशी मागणी केली. ती मागणी मान्य केली. हे काम पूर्ण होईपर्यंत निवडणुका घेऊ नये. ज्या तीन ते चार जिल्ह्यात जागा कमी होत आहे, तिथे काय करता येईल याचा विचार करावा चर्चा झाली अंतिम निर्णय झाला नाही’, असंही फडणवीस म्हणाले.

तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात

तर दुसरीकडे, ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे यासाठी बैठक घेण्यात आली होती. केंद्राचा इम्पेरिकल डाटा मिळावा यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी 23 सप्टेंबर रोजी आहे. तोपर्यंत काय काय करता येईल याबाबत चर्चा झाली. 50 टक्क्याच्या मर्यादेत आरक्षण देऊन निवडणूक घेऊया. SC, ST आरक्षणाला धक्का न देता 50 टक्क्याच्या आत आरक्षण बसवायचे किंवा राज्य मागासवर्ग आयोगाने इम्पेरिकल डाटा २ ते ३ महिन्यात गोळा करायचा, तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी चर्चा झाली, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई, कोकणात १३ तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, NDRF ची पथकंही तैनात

News Desk

विधानपरिषदेवर पाठवत नसल्याने सचिन सावंत फार निराशेतून बोलतात, फडणवीसांचा सावंतांना टोला

News Desk

कोल्हापूर शिवसैनिक बेळगावच्या दिशेने लाल-पिवळा ध्वज हटवण्यासाठी रवाना

News Desk