HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडी सरकार कसं आणि कधी पडणार हे अजित पवारांना माहिती आहे,चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट!

मुंबई | राज्यात ३ वेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र येत महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. या सरकारला पाडणण्यासाठी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून अनेक प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, अजूनही सरकार कायम आहे. याच सरकार पाडण्याच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीच्या नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरात भाषण देताना हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे, असं वक्तव्य केलं होतं. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे.

राज्यात सत्ताबदल होणार हे नक्की असून तो कसा होणार हे अजित पवारांना माहिती आहे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच पंढरपूर-मंगळवेढ्याची निवडणूक भाजप जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

“अजित पवारांना राज्यात करोनाचं संकट भीषण झालेलं असतानाही दोनदा येऊन राजकीयदृष्ट्या फार महत्व नसलेल्या लोकांच्या घऱी जावं लागतं. हा त्यांचा स्वभाव नाही, तो शरद पवारांचा स्वभाव आहे. निवडणूक त्यांच्या हातून गेल्याचं हे लक्षण आहे. ज्याप्रकारे ते बोलत आहेत त्यावरुन पायाखालची जमीन सरकली आहे असं दिसत आहे. पायाखालची जमीन सरकली ही जिभेवरचा ताबा सुटतो. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याची निवडणूक भाजपा जिंकणार हे स्पष्ट आहे,” असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

“अजित पवारांना काय झालं आहे माहिती नाही. पण अलीकडच्या काळात ते जोरात आहे. हिंदीमध्ये म्हण आहे की सौ चुहे खाके बिल्ली हज को चली,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला. त्यामुळे अजित पवार जास्त गमजा मारु नका. कालचक्र नेहमी फिरत असतं. ते आम्हालाही लागू पडेल. माणसाने नेहमी नम्र राहायचं असतं. नीट बोलायचं असतं. सरकार पडणार नसेल तर इतका आकांडतांडव कशासाठी? एखाद्याला आजार झाला नसेल तर त्यांना आजार झाला नाही म्हणण्याचं कारण नाही. तुम्हाला ते पडणार आहे याची जाणीव आहे. कधी आणि कसं पडणार याची तुम्हाला जाणीव आहे. त्यामुळे तुम्ही खोटा आव आणता. जेव्हा सरकार पडेल तेव्हा सर्व टाइमटेबल माहिती होतं असं मान्य कराल,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

अजित पवारांनी बोलायला सुरुवात करतानाच म्हटले की, राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नससो. आणि राज्यातील आघाडी सरकार पाडणे म्हणजे काय खेळ वाटतो काय? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले. काल सायंकाळी पंढरपूर येथील शिवाजी चौकात राष्ट्रवादी उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराची सभा घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरातील सभेतून राज्यातील सत्ताबदलाबाबत भाष्य केलं होतं. सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, अशा शब्दात फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला एकप्रकारे सूचक इशाराच दिला होता. त्यामुळे पंढरपूरातील या निवडणूकीत राष्ट्रवादी बाजी मारणार की भाजप हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#coronavirus : राज्यात पाच जणांचा मृत्यू, दिवसभरातला ‘कोरोना’चा दुसरा बळी

swarit

शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेस राज्यपालांना निवेदन देणार, बाळासाहेब थोरात

News Desk

जेजुरीगडाच्या विकासासाठी अजित पवारांचा पुढाकार ! दिला तब्बल ‘इतका’ निधी

News Desk