HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर भाजपसमोर महाविकासआघाडीचा निभावही लागणार नाही”, चंद्रकांत पाटलांचं आव्हान

मुंबई | पश्चिम बंगालसह ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल काल (२ मे) जाहीर झाले. या सगळ्या निकालात पश्चिम बंगालमधील निकालाची मात्र सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातही या निकालावरून सत्ताधारी पक्ष भाजपला लक्ष्य करताना दिसत आहे. सत्ताधारी पक्षांकडून होत असलेल्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चांगलेच सुनावले आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल आणि पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक निकलाच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला थेट आव्हान देणारं एक ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

“महाराष्ट्रात माझे आव्हान आहे, कोणत्याही निवडणुकीत चारही पक्षांनी वेगवेगळं लढून पाहावं, मग सर्वांना कल्पना येईल की कोणाला किती बोलण्याची पात्रता आहे. तीनही पक्ष एकत्रित असून, सुद्धा पंढरपुरात आमचा पराभव करू शकले नाहीत, मग हे वेगवेगळे लढले, तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही,” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिलं आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालकेंचा ३,७३३ मतांनी पराभव केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आघाडी विरोधात भाजपा अशी प्रतिष्ठेच्या झालेल्या या लढतीत भाजपने बाजी मारली. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात ही पोटनिवडणूक झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडेवर उपमुख्यमंत्र्यांची सडकून टीका

Aprna

“कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या निधनाने हानी”, मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

Aprna

…म्हणून सोलापूरात विरोधकांच्या संघर्ष यात्रेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

News Desk