HW News Marathi
महाराष्ट्र

‘भाजपचा आघाडीला डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम’, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

मुंबई। ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक झाली आहे. राज्य सरकारने ओबीसींना आरक्षण लवकरात लवकर दिलं पाहिजे असं भाजपने बजावलं आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींना आरक्षण दिलंच पाहिजे. आम्ही आघाडी सरकारला डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देतो. आरक्षण दिलं नाही तर आघाडीच्या मंत्र्यांना गावांमध्ये फिरू देणार नाही, असा इशाराच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. कायम केंद्राकडे बोट दाखवायच काम आता महाविकास आघाडीला करता येणार नाही. केंद्रानं आता राज्याला सर्वाधिकार होते, दिले आहेत आणि राहतील अशी व्यवस्था केली आहे.

फडणवीस सरकारनं आरक्षण दिल आणि टिकवूनही दाखवलं

महाविकास आघाडी सरकार केंद्रकडे सतत बोट करत आहेत त्यांनी आता ते बंद करायला हवं. कायम केंद्राकडे बोट दाखवायच काम आता महाविकास आघाडीला करता येणार नाही. केंद्रानं आता राज्याला सर्वाधिकार होते, दिले आहेत आणि राहतील अशी व्यवस्था केलीय. फडणवीस सरकारनं आरक्षण दिल आणि टिकवूनही दाखवलं होतं. या सरकारला मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचचं नाहीये. आता जे विधेयक पास होईल त्यानंतरही जर दुर्लक्ष झालं तर आम्ही गप्प बसणार नाही, असं सांगतानाच ओबीसी आरक्षणासाठी आम्ही महाविकास आघाडीला डिसेंबरपर्यंतचा अल्टीमेटम देत आहोत. जर आरक्षण दिल नाही, समाजाला न्याय दिला नाही तर राज्यातल्या एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.

प्रदेशाध्यक्षपदाची माहिती खोटी

सध्या भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षाचं पद बदलण्याची चर्चा आहे. चंद्रकांत पाटील हे आमचे नेते आहेत. त्यांच्या काळात पक्ष मोठा झाला. राज्यातील मंत्र्यांना भेटायला आम्ही दिल्लीत आलो आहोत. मात्र पक्षाध्यक्ष बदलण्याची बातमी 100 टक्के चुकीची आहे. ही बातमी जाणीवपूर्वक पेरली गेली आहे. हे कोणी केलं? आणि का केलं? याचा आम्ही शोध घेऊच, असं सांगतानाच कोण पसरवतंय, करतंय हे आम्हाला चांगल माहिती आहे, असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठीनं राज्याला जास्तीत जास्त फायदा कसा होईल यावर लक्ष देतोय. राजकीय फायद्यासाठी हे करणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.

दिल्लीत भाजप खासदारांची भेट

भाजपच्या गुप्त बैठकांमुळे चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये भाजप आमदार आशिष शेलार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात नुकतीच गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही दिल्लीतून बोलावण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यातच, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार हे नेतेही दिल्ली दरबारी येत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्राविषयी काही शिजतंय का? असा सवाल उपस्थित होत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोविंद पानसरे हत्येचा तपास एसआयटीकडून काढून घ्या, कुटुंबियांनी उच्च न्यायालयाकडे मागणी

News Desk

कल्पना गिरी खून प्रकरणातील आरोपीचे कुटुंबिय करणार उपोषण

News Desk

जाणून घ्या…शिंदे सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय

Aprna