HW News Marathi
महाराष्ट्र

अर्थसंकल्प फुटल्याच्या आरोपाचे मुख्यमंत्र्यांनी दिले सडेतोड उत्तर

मुंबई | राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (१८ जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. हा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर होण्यापूर्वीच अर्थमंत्र्यांच्या ट्विटरवरून फुटल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सभागृहात केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या आरोपाचे खंडण केले.

अर्थसंकल्प फुटला हा विरोधकांचा गैरसमज झाला आहे. सध्या डिजिटल माध्यमे अतिशय प्रगतशील झाली आहेत. अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर काही क्षणात गोष्टी ट्विटरवर येत आहेत. हे बदललेल्या तंत्रज्ञानाचा परिणाम आहे. विरोधीपक्षांनी या गोष्टी लक्षात घ्याव्या. आम्ही सकारात्मकतेसाठी त्याचा वापर करत आहोत, आणि विरोधकांनीही हे तंत्रज्ञान आत्मसात करावे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंदोरीकर महाराजांना पुत्र प्राप्तीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी ७ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

News Desk

मुंबई आणखी गारठणार, तापमानात थेट १० अंशांची घट

News Desk

जरंडेश्वर साखर कारखान्यावरील ED कारवाईवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

News Desk