HW News Marathi
महाराष्ट्र

अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे (Monsoon) शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज (19 ऑक्टोबर) दिले.

यासंदर्भात मुख्यमंत्री  शिंदे यांनी सांगितले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादेत भव्य मराठा क्रांती रॅली

News Desk

जाणून घ्या… राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देते गेलेल्या नेत्यांचे निवडणुकीत नेमके काय झाले

News Desk

फडणवीसांच्या दिल्ली मेट्रो प्रवासावरुन कॉंग्रेस, राष्ट्रवादीची टोलेबाजी

News Desk