HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे | नारायण राणे

मुंबई | आघाडी सरकारच्या काळात मराठ्यांना आरक्षण लागू झाले होते. या आरक्षणामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देखील मिळाला होता. मात्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आरक्षण बंद करण्यात आले, असे खासदार नारायण राणे म्हटले आहे. सध्या महाराष्ट्र मराठा समाजने आरक्षणासाठी जाळपोळ आणि तोडफोडीमुळे राज्याचे नुकसान होत आहे.

आरक्षणाच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने आरक्षण द्यावे. आघाडी सरकारच्या काळात राणे समितीने आरक्षणाबाबतच्या सर्व अडचणी दूर केल्या होत्या. राणे समितीने शैक्षणिक, सामाजिक आणि मागसलेपणाचा सर्व्हे करून आरक्षण दिले होते. त्याच्या आधारे आघाडी सरकारकडून आरक्षणाची अंमलबजावणी देखील करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लोकसभा निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार

swarit

नवाब मलिकांना बाहेर आणण्यासाठी आम्ही संघर्ष करत राहणार! – शरद पवार

News Desk

राज्यात सर्वसामान्यांना न्याय देणारे शासन कार्यरत! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna
देश / विदेश

आज ‘ब्लडमून’ चंद्रग्रहण

News Desk

मुंबई | चंद्र ग्रहण यंदा गुरू पौर्णिमेच्या दिवशी आल्याने ते खास ठरणार आहे. हे ग्रहण सुमारे 3 तास 55 मिनिटं चालणार आहे. यंदा गुरू पौर्णिमेला होणारे चंद्रग्रहण शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण आहे. २७ जुलैच्या रात्री ११ वाजून ५४ मिनिटांनी हे सुरू होईल. २८ जुलैच्या सकाळी ३ वाजून ५ मिनिटांनी चंद्रग्रहण संपणार आहे.

चंद्रग्रहणाचा सुतककाळ हा दुपारी २ वाजता सुरू होणार आहे. २७ जुलै २०१८ ला होणारे चंद्रग्रहण भारत, दक्षिण आफ्रिका, पश्चिम आशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोपातून दिसणार आहे. ३१ जानेवारी २०१८ रोजी यंदाचे पहिले चंद्रग्रहण झाले. या प्रकाराला ‘ब्लडमून’ म्हणतात. ग्रहणादरम्यान सूतक हा एक महत्त्वाचा काळ समजला जातो. त्यानुसार सूर्यग्रहणात सूतक काळ हा १२ तास आधी तर चंद्रग्रहणात सुतककाळ ९ तास आधी सुरू होतो. धार्मिक मान्यतांनुसार, ग्रहणादरम्यानच्या सुतककाळात नकारात्मक उर्जा असते. या काळात अनेकजण शुभ काम करणं टाळतात.

ग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ५५ मिनिटे एवढा जास्त असून खग्रास स्थितीचा काल १ तास ४३ मिनिटांचा असणार आहे. रात्री ११.५४ वाजता ग्रहणास प्रारंभ होईल. उत्तररात्री १ वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीस प्रारंभ होईल. उत्तररात्री २.४३ वाजता खग्रास स्थिती समाप्त होईल. आणि उत्तररात्री ३.४९ वाजता ग्रहण सुटेल. हे ग्रहण भारताप्रमाणेच संपूर्ण आशिया खंड, अंटार्टिका, रशियाचा काही भाग, आफ्रिका, युरोप आणि दक्षिण अमेरिकेचा काही भाग येथून दिसणार आहे.

Related posts

मुख्यमंत्री पदाची शपथविधीपूर्वी येडियुरप्पांनी असा केला नावात बदल

News Desk

सुनावणीसाठी न्यायालयात जाणाऱ्या सामूहिक बलात्कार पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

News Desk

वाहतूक व दळणवळणासाठीच्या अर्थसंकल्प २०२०-२१ मधील महत्त्वाच्या तरतूदी

swarit