HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (१३ सप्टेंबर) दुपारी १ वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री लोकांशी संवाद बोलणार आहेत. एकीकडे राज्यातील कोरोनास्थिती गंभीर होत जात असताना राज्याचे अर्थचक्र रुळावर आणण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारपुढे आहे. याच पार्श्वभूमीवर, अनेक दिवसांनंतर आज मुख्यमंत्री लोकांशी नेमके काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना आणि सोयी-सुविधांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आले आहे. कोरोनाच नव्हे तर अन्य अनेक प्रकारणांवरून राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गेल्या काही काळात राज्यात अत्यंत वेगाने अनेक घटना घडल्या आहे. यावर मुख्यमंत्री नेमके काय भाष्य करणार हे देखील महत्त्वाचे आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? मुख्यमंत्री म्हणतात…

News Desk

१८ वर्षावरील सगळ्यांनाच कोरोना लस द्या, IMAची मोदींना पत्रातून विनंती

News Desk

आपल्या नागरिकांना राज्यात आणण्यास पश्चिम बंगाल सरकारचे सहकार्य नाही !

News Desk