HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मौन हे चिंताजनक, राज्यपालांनी त्यांना बोलतं करावं – देवेंद्र फडणवीस  

मुंबई | राज्यात सध्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, सचिन वाझे प्रकरण, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात केलेले आरोप या सगळ्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट होत्या असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता यावरुन आता देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. जर कोणत्या अधिकाऱ्याने खरे सांगितले तर तो भाजपचा एजंट ठरतो आणि जर हफ्ता वसूली केली तर तो काय शिवसेनेचा एजंट आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

भाजपचे शिष्टमंडळ मुंबईतील राजभवनात आज (२४ मार्च) सकाळी दाखल झाले होते. यानंतर त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. भाजपच्या या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा हे नेते सहभागी आहेत. जवळपास तासाभर भाजपचे शिष्टमंडळ आणि राज्यपालांची खलबतं सुरु होती. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत महाविकासआघाडी सरकारवर टीका केली.

ज्या प्रकारच्या घटना गेल्या काही दिवसात बाहेर येतात. हे अत्यंत चिंताजनक आहे. या घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मौन हे चिंताजनक आहे. शरद पवारांनी दोन प्रेस घेतल्या. पण त्यांनी पाठीशी घालण्याचे काम केले. तर काँग्रेस अस्तित्वहीन आहे. त्यांची काहीही भूमिका नाही. त्यांचे नेते दिल्लीत एक आणि इथे वेगवेगळं बोलतात, असेही फडणवीस म्हणाले आहेत.महाविकासआघाडीने सर्व नैतिकता पायाखाली तुडवली आहे. केवळ सत्तेसाठी या ठिकाणी हे सर्व काम चाललं आहे. त्यापलीकडे काहीही नाही, असेही फडणवीसांनी सांगितले. काँग्रेसला किती हिस्सा आणि वाटा मिळतो हे सांगावे. राज्यपालांना वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यापालांनी बोलत करावं. खंडणीच्या घटनेत काय कारवाई केली? याबाबतचा अहवाल घेतला पाहिजे, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.जर तो लवंगी फटका होता की मोठा बॉम्ब, हे लवकरच समोर आले. जर २५ ऑगस्ट २०२० पासून तो इतके दिवस का दाबून ठेवला कोणाचे चेहरे बाहेर येणार होते. नेमकं कोण यात लिप्त आहेत. त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही दाबून ठेवला. संजय राऊतांकडे फार वेळ आहे. ते काही एवढे मोठे नाहीत. की त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे द्यायला हवीत, असेही फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते संजय राऊत?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना दिलेल्या बदल्यांच्या रॅकेटच्या अहवालाची अक्षरश: खिल्ली उडवली. फडणवीस दिल्लीत बॉम्ब घेऊन आले होते. पण तो भिजलेला लवंगी फटका निघाला. त्याला वातही नव्हती, अशा शब्दात राऊत यांनी खिल्ली उडवली. तसेच अनिल देशमुख हेच राज्याचे गृहमंत्री राहणार असल्याचं स्पष्ट केलं

“तो जो काही बॉम्ब घेऊन विरोधी पक्षनेते आले होते तो भिजलेला लवंगी फटाका आहे. त्या फटाक्याला वातसुद्धा नव्हती. आम्ही दिल्लीत कुठे स्फोट झाला, महाराष्ट्रात काही पडसाद उमटतात का पाहत होतो. पण तसं काही दिसलं नाही. बंगालप्रमाणे महाराष्ट्र आणि दिल्लीत ‘खेला होबे’ सुरु आहे. यामुळे लोकांचं चांगलं मनोरंजन होत असून त्यासाठी कोणता मनोरंजन टॅक्सही भरायची गरज नाही,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वैद्यकीय गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र पोलीस विभाग स्थापनचा विचार करा, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना

News Desk

बावनकुळेंवर अन्याय झाला तेव्हा इतका गलबललो नव्हतो, अमोल मिटकरींचे सुचक ट्विट

News Desk

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, दोघांमध्ये अर्धा तास चर्चा

News Desk