HW News Marathi
महाराष्ट्र

“उद्धव ठाकरे यांच्याकडून खुप अपेक्षा, तुमची छबी तशीच राहू द्या”, चित्रा वाघ यांची मागणी

पुणे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी आपले सरकार शिवशाहीचं असल्याचं सांगतात. मात्र, हे सरकार शिवशाहीचं आहे, हे आता कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहे. शिवशाहीत बलात्काऱ्यांचा चौरंग व्हायचा. आता चौरंग करता येत नाही, पण किमान गच्छंती करा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

आज (२५ फेब्रुवारी) वानवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खूप अपेक्षेने बघत आहोत. तुमची छबी तशीच राहू द्या, आम्हाला महाविकासआघाडी सरकारमधील इतर कोणत्या मंत्र्याकडून अपेक्षा नाही, असे चित्रा वाघ यांनी म्हटले. तसेच शक्ती कायद्यात सत्तेत असलेल्या पक्षाचे मंत्री आणि नेत्यांना क्लीन चीट द्यायची, अशी तरतूद आहे का, असा खोचक सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नितीन गडकरी दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात” राज्यपालांच विधान!

News Desk

‘मंदा म्हात्रेंच्या विधानावर आता चंद्रकांत पाटलांचं उत्तर! म्हणाले….’

News Desk

अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी भाजपा वचनबध्द – प्रविण दरेकर

News Desk