HW News Marathi
महाराष्ट्र

नाशिक निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी भाजपने स्थायी सदस्य पाठवले सहलीला!

नाशिक | सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यामुळे उमेदवार पळवणे, वेगवेगळी राजकीय खेळी खेळणे या सगळ्याला सुरुवात झाली आहे. सांगलीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर आता नाशिकमध्येही राजकीय उलाढाल पाहायला मिळत आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापले आहे.

स्थायी समिती सभापतीच्या निवडीवरून भाजप आणि शिवसेनेत संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सांगली महापालिका निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे नाशिकमध्ये भाजपने खबरदारी घेतली आहे.स्थायी समितीच्या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून भाजपने आपले नवनियुक्त ८ स्थायी सदस्य सहलीवर पाठवले आहे. आक्रमक झालेल्या शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने सावध पवित्रा घेतला आहे.

भाजपची २ मतं फोडण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जोरदार हालचाली सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी सांगली महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपचा कार्यक्रम केला होता. भाजपच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले होते. त्यामुळे नाशिकमध्ये सांगलीचा प्रकार होऊ नये म्हणून भाजपकडून खबरदारी घेतली जात आहे.भाजपकडे ८ तर महाविकास आघाडीकडे ७ सदस्य आहे. यात मनसेचं १ मत निर्णायक ठरणार आहे.

मनसेचा कल सुद्धा भाजपच्या बाजूनं असल्याची अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे मनसे भाजपला टाळी देणार की तटस्थ राहणार पाहण्याचे ठरणार आहे.दरम्यान, स्थायी सदस्य निवडणूक वादग्रस्त झाली आहे. भाजपच्या धक्कातंत्रावर शिवसेनेनं कुरघोडी केली आहे. भाजपच्या ४ सदस्यांचा राजीनामा न घेता इतर सदस्यांची नियुक्ती केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. त्यानंतर सेनेच्या आरोपाला नगरसचिवांनी चक्क लेखी दुजोरा दिला आहे. तर सर्वपक्षीय गटनेत्यांची पत्र आपल्याकडे असल्याचा दावा भाजपने केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘तो’ मायचा पूत अजून जन्माला आला नाहीय!; उद्धव ठाकरेंचा इशारा

News Desk

घराघरात जाताय? जा जा, मुंबईकर तुमची वाटच पाहत आहेत – आशिष शेलार 

News Desk

“राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा”,अजित पवारांचे आवाहन

Aprna