HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यामागचे चित्रा वाघ यांचे ‘हे’ कारण

मुंबई | राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काल (२७ जुलै) राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. चित्रा वाघ या ३० जुलैला भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.चित्रा वाघ या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेत्या मानल्या जात होत्या. परंतु च्या राजीनाम्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असल्याचे राजकीय वर्तुळात बोले जाते.गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ या पक्षावर नाराज असल्याचे बोले जाते.

चित्रा वाघ त्यांचे पती किशोर वाघ हे सरकारी नोकर असून त्यांच्यावर २०१६ मध्ये लाचलुचपत विभागाने ४ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. या प्रकरणातून त्यांची सुटका होण्यासाठी चित्रा वाघ या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना पक्ष सोडून जाणे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातो. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. इतकेच नव्हे तर चित्रा वाघ यांच्या सोबत अकोल्याचे आमदार वैभव पिचड हे देखील पक्षाला रामराम ठोकत भाजप प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे. चित्रा वाघ यांच्यासोबत अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे जेलमध्ये जाणार”, प्रदीप शर्मांवरुन सोमय्यांची टीका

News Desk

‘ओबीसींचा प्रश्न कसा सोडवायचा ते सांगा, सत्तेत येण्याची गरज नाही’ – जयंत पाटील

News Desk

बीडमधील शिवसैनिकांची आमदार संदीप क्षीरसागर विरोधात उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंकडे थेट लेखी तक्रार

Aprna