HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यात बंद दाराआड चर्चा!

मुंबई। दिल्लीवारी करून परतलेले भाजपचे नेते आता राज्यात कामाला लागले आहे. आज मुंबईत भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

20 मिनिटं बंद दाराआड चर्चा

आज मार्मिक वर्धापन दिन सोहळा मुंबईत पार पडत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमाला प्रवीण दरेकर यांनी हजेरी लावली. यावेळी दरेकर यांच्या मार्फत पूरग्रस्त भागांसाठी दीड कोटींची मदत देण्यात आली आहे. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. सुमारे 15 ते 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती, मिळाली.देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली याची राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोल्हापुरात एकमेकांच्या समोरासमोर आले

दरम्यान, 30 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे महापूर आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत होते त्याच वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर हे सुद्धा पूरग्रस्त भागाचा दौऱ्यावर होते. याच दरम्यान आजी-माजी मुख्यमंत्री हे कोल्हापुरात एकमेकांच्या समोरासमोर आले होते.

कोल्हापुरात विरोधी पक्षनेते दौऱ्यावर होते ज्यावेळी चिखली, आंबेवाडी या दोन गावांना विरोधी पक्षनेत्यांनी भेटी दिल्या त्यानंतर उत्तरेश्वर पेठेतील पूर परिस्थितीची पाहणी करून ते शाहूपुरी सहावी गल्लीमध्ये येणार होते आणि झालही तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते शाहूपुरी गल्लीत बरोबर 12 वाजता दाखल झाले आणि त्यावेळी त्यांनी पूरग्रस्तांची चर्चाही सुरू केली. त्यावेळी मुख्य रस्त्यापासून जवळपास 50 मीटर अंतरावर भाजपचे नेते पोहोचले होते. त्याच वेळी थेट शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी मधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा कुंभार गल्लीच्या त्याच जागेवर 12 वाजून 14 मिनिटांनी आला. जिथं फडणवीस यांच्या गाडीचा ताफा लागला होता आणि मग काय ही नक्कीच राजकीय वर्तुळातील मोठी बातमी ठरली.

नेमक्या त्याच वेळी फडणवीस आणि भाजपचे इतर नेते या गल्लीमधून मुख्य रस्त्याकडे येत होते आणि उद्धव ठाकरे हे पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गल्लीमध्ये पुढे जात होते. त्यावेळी या दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट झाली सुरुवातीला मिलिंद नार्वेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ गेले त्यांनी फडणवीस यांच्याशी काहीतरी बोलणं केलं आणि मग फडणवीस आणि नार्वेकर एकत्रपणे उद्धव ठाकरे यांच्या जवळ आले होते. या यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वाझेंची नियुक्ती करू नका म्हणून शरद पवार, राऊत, देशमुखांना भेटलो”,अबू आझमींचा गौप्यस्फोट

News Desk

कोल्हापुरातील मूक आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी कुणालाही उलटसुलट बोलू नये, संभाजीराजेंचं आवाहन

News Desk

कर्जमाफीच्या रकमेसाठी शेतक-यांना दिवाळीची वाट पहावी लागणार

News Desk