HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन ४ संदर्भात आज काय बोलणार ?

मुंबई | कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव राज्यात वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काल (१७ मे) ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. ३१ मे नंतर पुढील निर्णय सूचित करण्यात येईल, असे राज्य सरकारने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (१८ मे) राज्यातील जनतेला संबोधित करणार आहे.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1262352775511334912?s=20

चौथ्या लॉकडाऊनमध्ये राज्य सरकार कोणते पावले उलणार, रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन, यासंदर्भातील काय नवीन नियम, राज्यातील स्थलांतरित मंजूर त्याच्या राज्यात परत पाठवण्यासाठी काय करणार, कोणत्या जिल्ह्यात नियम शिथिल करणार, आदी गोष्टीसंदर्भात काय बोलणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला

राज्य सरकारने काल साथरोग कायदा १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत शासनास असलेल्या अधिकारांचा वापर करून राज्याच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य सचिव अजोय मेहता यांनी हे आदेश जारी केले आहेत. यापूर्वी वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची शासनाच्या सर्व विभागांनी या कालावधीत काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच यापूर्वी काढण्यात आलेले सर्व आदेश ३१ मे पर्यंत लागू राहतील, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहेत. विभागनिहाय सूट किंवा लॉकडाऊन उठविण्यासंदर्भात योग्य त्या सूचना वेळोवेळी दिल्या जातील, असेही त्यांनी या आदेशात म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उद्यापासून पॅसेंजर ट्रेन्स सुरु होणार, रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

News Desk

विरोधकांना कामधंदा नाहीय, जुनी गोष्ट उकरून काढतायत ! अजित पवारांची टीका

News Desk

पुण्यातील १५ हजार स्थलांतरित मजुरांची पहिली यादी तयार

News Desk