HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्राच्या बदनामीविषयी मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून बोलणार, उद्धव ठाकरे आक्रमक !  

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. कोरोनाच्या संकटावर राज्यशासन करत असलेल्या उपाययोजना तसेच नागरिकांनी आता जबाबदारी आणि खबरदारी घेण्याविषयी सुचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना काळात सध्यातरी मी राजकारणावर बोलणार नाही. मात्र, महाराष्ट्राच्या बदनामाचा जो काही डाव आखला जात आहे त्याविषयी मी एकदा मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढून बोलणार आहे.त्यामुळे सध्या चाललेल्या घडामोडींवर मुख्यमंत्री आक्रमक पाहायला मिळाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “तुर्त मी राजकारणाविषयी बोलणार नाही. मात्र, महाराष्ट्राच्या बदनामीचा जो काही डाव आखला जात आहे त्याविषयी मी एकदा मुख्यमंत्रिपदाचा मास्क थोडावेळ बाजूला काढून जरुर बोलणार आहे. मी बोलत नाही याचा अर्थ माझ्याकडे उत्तरं नाहीत असं नाही. पण मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलेलो आहे. त्याला अनुसरुन काम करावं लागतं.”
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विमानात अडकले २३४ प्रवासी

News Desk

देवेंद्र फडणवीसांना पक्षाकडून मोठी जबाबदारी ! केंद्रीय नेतृत्त्व लवकरच करणार घोषणा

News Desk

भारतीय अंतराळवीर आता जाणार आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर

Gauri Tilekar