HW News Marathi
Covid-19

“मास्क न वापरण्यात काय शौर्य आहे?”, मुख्यमंत्र्यांची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका

मुंबई । राज्यातील कोरोनस्थिती बिकट होत चालली आहे. दिवसेंदिवस खळवणाऱ्या या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२ एप्रिल) राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी, नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. “मास्क न वापरण्यात काय शौर्य आहे?”, असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

राज ठाकरे हे मास्क वापरत नाहीत. एका कार्यक्रमात याविषयी एका पत्रकाराने राज ठाकरेंना प्रश्न विचारला असता, “मी मास्क वापरतच नाही” असे उत्तर राज ठाकरेंनी दिले. त्यावेळी राज यांच्या या उत्तराची मोठी चर्चाही झाली. याचवरून मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “काही लोक म्हणतात ‘मी मास्क लावत नाही. मास्क न वापरण्यात काय शूरता आहे काय ?” असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

महापौरांचीही टीका !

“खरंतर राजकीय नेत्यांनी लोकांचे प्रबोधन करायचे असते. मात्र, कोणतेही नियम न पाळणाऱ्या राजकीय नेत्यांचे प्रबोधन कोण करणार ? हाच खरा यक्ष प्रश्न आहे”, असा टोला महापौरांनी विचारला आहे. “कोरोनाच्या संकटात राजकारण करणं योग्य नाही. कोरोनामुळे लोक मरत आहेत. त्यामुळे ज्यांच्या जीवावर निवडून येतो, त्यांना चेतवणे योग्य नाही. राजकारण्यांनी नागरिकांच्या जीवाशी खेळू नये”, असे सांगत नागरिकांचं प्रबोधन करता येईल. पण राजकीय नेत्यांचे प्रबोधन कोण करणार हाच खरा यक्ष प्रश्न आहे”, असा सवाल महापौरांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दारु विक्रीसाठी होम डिलेव्हरीचा मार्ग निवडावा, सर्वोच्च न्यायालयाने दिल्या सूचना

News Desk

महाराष्ट्र शोकमग्न आहे! । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

News Desk

नाशिकमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विकेण्ड लॉकडाऊन जारी तर अनेक निर्बंधही केले लागू

News Desk