HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेली ‘ही’ योजना ठाकरे सरकारकडून रद्द  

मुंबई | राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकारने आता देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील एक निर्णय रद्द केला आहे. फडणवीस सरकारने राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणलेली ‘बळीराजा चेतना योजना’ रद्द करण्याचा निर्णय बुधवारी (५ ऑगस्ट) महाविकासआघाडी सरकारने घेतला आहे. “बळीराजा चेतना योजनेला विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात पूर्णपणे अपयश आल्याने २४ जुलै २०१५ रोजी जाहीर करण्यात आलेली ही योजना तातडीने रद्द करण्यात येत असल्याचे राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात २०१६ साली आलेल्या ‘बळीराजा चेतना योजना’अंतर्गत व्यथित शेतकर्‍यांना शोधणे, शेतकर्‍यांच्या मुला-मुलींसाठी सामूहिक विवाह आयोजित करणे, त्यांना उत्तम आरोग्य सेवा पुरवणे आणि कर्जाचे पुनर्गठन करणे अशा सुविधा देण्यात आल्या. दरम्यान, राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, “२००१ ते २०१९ या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल ३२ हजार ६०५ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. देवेंद्र फडणवीस जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या काळात विशेषतः २०१५ ते २०१८ दरम्यान यापैकी ४६% म्हणजेच १४ हजार ९८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं?”, फडणवीसांचा सवाल

News Desk

शरद पवार ब्रीच कँडीमध्ये दाखल, उद्या पित्ताशयावर होणार शस्त्रक्रिया

News Desk

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना अधिकच्या विशेष गाड्या सोडा, शेलारांची मागणी

News Desk