HW News Marathi
Covid-19

“कळत नकळत होणारा कोरोनाचा प्रसार घातक”, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता 

मुंबई | आज (१० एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची संख्या सातत्याने वाढत असल्याकारणाने लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले आहे. संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेण्याशिवाय आता पर्याय नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आज राज्यात लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्वपक्षीय बैठकीत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात या सगळ्या नेत्यांची उपस्थिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू होताच राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचं सादरीकरण केलं. राज्यातील रुग्ण, मृतांचा आकडा, औषधांचा उलब्ध साठा, लसीकरणाची माहिती आणि संसर्गाचा धोका, आदीबाबतची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला लॉकडाऊन शिवाय पर्याय नसेल तर सांगितलं. तसेच, १५ तारखेपर्यंत स्थिती आणखी गंभीर होणार असल्याचंही कुंटे म्हणाले. तसेच, राज्यत लसीचा तुटवडा आहे., रेमडेस्विरचाही तुटवडा असल्याने लवकर साठा पुरवण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.

कळत नकळत होणारा प्रसार घातक – मुख्यमंत्री

राज्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या नियंत्रणात आणावी लागेल. रुग्ण संख्या नियंत्रणात आणायची असेल तर कोरोनाची साखळी तोडावी लागणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय आहे. त्याबाबतचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तसेच, लोकांचं येणं जाणं थांबलं पाहिजे, कार्यालयाच्या वेळा बदलल्या पाहिजे. घरातूनच कामाचं नियोजन झालं पाहिजे. पीक अवर ही संकल्पनाही बदलली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यायचा झाल्यास तो एकमताने घेतला गेला पाहिजे. लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही, असं मत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे राज्यात संपूर्ण लॉकडाऊनसाठी होकार देण्याचं आवाहनच सर्व पक्षांना केलं आहे.

कोरोनाचा कळत नकळत होणारा प्रसार अत्यंत घातक आहे. तरुण वर्ग कोरोनामुळे अधिक बाधित होत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे २५ वयापासूनच्या पुढील तरुणांना लस देण्याची परवानगी देण्याची पंतप्रधानांकडे मागणी करण्यात आली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तरुणांना, लहान मुलांनाही कोरोनाची लागण होत असल्याने सगळ्यांना लस देणे गरजेचे आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपशासित राज्यांतच ‘मोदी मॉडेल’चा फज्जा !

News Desk

लॉकडाऊनमध्ये राज्यात आतापर्यंत तब्बल ६९ हजार गुन्ह्यांची नोंद

News Desk

‘दो गज दुरी’ या मंत्राचा वापर करा, पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

News Desk