HW News Marathi
Covid-19

“पुर्ण लॉकडाऊन केला जर जनतेचा उद्रेक होईल”, फडणवीसांचा सरकारला इशारा

मुंबई | राज्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं मत आज (१० एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडले. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्वपक्षीय बैठक ही राज्यातील कोरोना स्थितीवर आणि लॉकडाऊनवर आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने संपूर्ण लॉकडाऊनला विरोध केला असून निर्बंध असलायला हवे असे मत मांडले आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

निर्बंध असायला हवेत, पण जनतेचा उद्रेक लक्षात घेतला पाहिजे, असं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पूर्ण लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल, असा इशाराही देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. तसेच, रिपोर्ट्स तात्काळ कसे मिळतील ही उपाययोजना करायला हवी. खासगी स्तरावर रेमडेसिवर कुठेही नाही ही गंभीर बाब आहे. रेमडेसिवर कसे उपलब्ध होतील हे पाहिले पाहिजे. व्यवस्था तात्काळ उभ्या कराव्या लागतील. ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी लागेल, इतर ठिकाणांहून कसं ऑक्सिजन मिळालं पाहिजे, इंडस्ट्रीचं ऑक्सिजन कमी करावं लागेल, बेड्स मॅनेज करावे लागतील, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव किती दिवस राहील हे सांगता येत नाही, त्यामुळे व्यवस्था तात्काळ उभ्या कराव्या लागतील. निर्बंध काही प्रमाणात असले पाहिजे. जनतेचा उद्रेक ही लक्षात घेतला पाहिजे. काही तर मार्ग काढावा लागेल, असंही फडणवीसांनी अधोरेखित केलं आहे. तसेच, राज्याचे कर्ज वाढले तरी चालेल मात्र सरकारने सामान्य लोकांचा, व्यापाऱ्यांचा विचार केला पाहिजे असे मत फडणवीसांनी मांडले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीवरुन लॉकडाऊनची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे पुर्ण संकेत दिले असून भाजपचा मात्र याला विरोध आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive : अजित पवार मुख्यमंत्री होणार का ?

News Desk

राज्यात परतणाऱ्या परप्रांतीय श्रमिक व कामगारांची स्थलांतरित कायद्यान्वये नोंदणी करावी !

News Desk

धारावीतील लोकांच्या कोरोनाच्या टेस्ट केल्या जात नाहीत – दरेकरांचा आरोप

News Desk