HW News Marathi
महाराष्ट्र

“स्वराज्याला ७५ वर्ष झाली, सुराज्य आलं का?”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । “हा नुसता स्वातंत्र्य दिनाचा उत्सव नाही. तर हा जात, पात, धर्माच्या पलीकडे जाऊन देशाप्रति आपल्या सगळ्यांच्या असलेल्या भावनांचा सन्मान आहे”, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (१२ मार्च) ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमात केले आहे. “आता स्वराज्याला ७५ वर्ष झाली. सुराज्य आलं का? आपल्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्यांची, त्यांच्या बलिदानाची आठवण काढतो. मात्र तितकंच पुरेसं नाही. तर या महान शहीदांना अभिमान वाटेल असं जगणं असा देश उभा करणे हे आपल्याला जमलं आहे का ? हा प्रश्न आहे”, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटले आहेत.

“कित्येकांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य मिळाले आहे. आपल्या पिढीला हे स्वातंत्र्य आयतं मिळालंय. आता या स्वातंत्र्याचे रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. ऑगस्ट क्रांती मैदान हे एक रणमैदान होते. ते आज शांत आहे. स्वातंत्र्याचं तेज आता जपलं पाहिजे. हे मैदान बोललं पाहिजे, तो इतिहास जिवंत करणार स्मारक इथे झालं पाहिजे”, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तर “मुख्यमंत्र्यांना विनंती करीन स्वातंत्र्याचे हे केंद्र आहे. इथून सगळ्यांना प्रेरणा मिळेल, असं एक स्थान निर्माण करावं अशी इच्छा व्यक्त करतो”, असे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.

“ऑगस्ट क्रांती मैदान हे एक रणमैदान होते. स्वातंत्र्य चळवळीची आठवण देणाऱ्या या मैदानाचे नुसते नुतनीकरण न करता या मैदानात स्वातंत्र्यलढा जिवंत करणारे स्मारक करावे. इतिहास जिवंत ठेवणे व तो पुढच्या पिढीपर्यंत पोचविणे हे आपले कर्तव्य”, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे, “हौतात्म आठवण करून भागणार नाही, तर ज्यांनी आपले आयुष्य वेचले त्यांना अभिमान वाटेल असा देश उभा करता येईल का, स्वराज्याबरोबरच सुराज्य आणू शकतो का ? हा विचार व्हावा”, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे-शरद पवारांमध्ये रात्री उशिरापर्यंत बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला, खातेवाटपावर चर्चा

News Desk

अखेर अण्णा हजारेंचे उपोषण मागे! फडणवीसांच्या मध्यस्थीने घेतला निर्णय

News Desk

“नारायण राणे डगमणारे नेते नाहीत, ते खंबीर”, रामदास आठवलेंचा नारायण राणेंना जाहीर पाठिंबा

News Desk