HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याच्या मोदींच्या निर्णयाचे मानले आभार!

नवी दिल्ली | कोरोना लसीकरणाचा मोठा टप्पा पार होणार आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १ मे पासून कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. १८ वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला.यापूर्वी सर्वात आधी ६० वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात होती. त्यानंतर १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोव्हिड १९ लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत.
काय म्हणाले उध्दव ठाकरे?
आज केंद्र शासनाने १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.
राज्यात या अनुषंगाने पूर्ण नियोजन केले जाईल व लसीचा पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी देशातील २५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईकरांसाठी परदेशातून लसी मागवण्यासंदर्भात हालचाली सुरु – आदित्य ठाकरे

News Desk

दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना ‘कोरोना’ची लागण

News Desk

आजपासून मुंबईमध्ये इलेक्ट्रॉनिक्स व हार्डवेअरची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी

News Desk