HW News Marathi
Covid-19

मानलं राव! गडकरींनी वर्ध्यातील कंपनीला मिळवून दिला रेमडेसिवीर उत्पादनाचा परवाना

वर्धा | कोरोनाचा कहर राज्यात वाढत असताना इतर अनेक अडचणींचा सामनाही सरकार आणि आरोग्य यंत्रणेला करण्यात येत आहे. एकीकडे कोरोनावर प्रभावी पडणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा जाणवत आहे. तर दुसरीकडे वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये आजपासून रेमडेसिव्हीर इंजेक्शन निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे.

या ठिकाणी रोज ३० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन बनवण्याचे लक्ष्य आहे. विशेष म्हणजे वर्ध्यातील या कंपनीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परवाना मिळवून दिला आहे. वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये आजपासून रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती करण्यात येणार आहे. नुकतंच नितीन गडकरी यांनी वर्ध्याच्या जेनेटिक सायन्स लॅब कंपनीचा आढावा घेतला.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्यातील रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत होता. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी जेनेटिक सायन्स लॅबला रेमडेसिव्हीर उत्पादन करण्याची परवानगी मिळवून दिली. नितीन गडकरींच्या पाठपुराव्याने या ठिकाणी रेमडेसिवीरचे उत्पादन करण्यात येणार आहे. तसेच जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये ३० हजार बनवण्याचा लक्ष्य आहे. हैदराबाद येथील हेट्रा कंपनीकडून सेवाग्राम येथील जेनेटिक लाईफसायन्सला उसणवार तत्वावर निर्मिती करण्याची परवानगी मिळाली आहे.

महाराष्ट्र आणि नागपूरमधील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले होते. कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. नितीन गडकरी यांच्या चर्चेनंतर नागपूरला ४ हजार इंजेक्शन पाठवण्यात मिळाली होती.

नितीन गडकरींच्या पुढाकारामुळे नागरपूरमधील ‘रेमडीसिविर’च्या तुटवड्याचा प्रश्न सुटला

राज्यातील कोरोनस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. तर केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या लसींच्या तुटवड्यामुळे परिस्थिती आणखी चिंताजनक होत आहे. अशातच दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यातील अनेक जिल्ह्यात रेमडेसिविरचा तुटवडा भासत होता. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात देखील रेमडीसिविर इंजेक्शनची टंचाई भासत होती. मात्र, हीच टंचाई संपविण्यासाठी आता स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला होता. या मार्फत नागपूरमध्ये सन फार्मातर्फे या इंजेक्शनचे १० हजार डोसेस उपलब्ध करुन दिले जाणार होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठरलं! जून महिन्यापासून लहान मुलांवर कोव्हॅक्सिनची होणार ट्रायल

News Desk

राजधानी दिल्लीत विकेंन्ड कर्फ्यू, अरविंद केजरीवालांची घोषणा

News Desk

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा अखेर ४ लाखांच्या खाली!

News Desk