HW News Marathi
महाराष्ट्र

एल्गार परिषदेत हिंदूंबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी विरोधात अखेर गुन्हा दाखल

पुणे | पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे ३० जानेवारीला झालेल्या एल्गार परिषदेत विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप युवा मोर्चाचे पुणे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांनी शरजील उस्मानी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी स्वारगेट पोलिसांकडे केली होती. तसेच, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तातडीने कारवाई करण्यासाठी पत्र लिहिले होते.

पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना याबाबत एक पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आता शरजील उस्मानी विरोधात स्वारगेटमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

३० जानेवारी रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पोलीस परवानगीनुसार, एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात आयोजकांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी याला भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते. यामध्ये आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संघराज्य व हिंदूंविरोधात अत्यंत आपत्तीजनक विधाने केली होती. शरजिल उस्मानी याने एल्गार परिषदेत ”हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरिके से सड़ चुका है” आणि भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ व प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत ”मी भारतीय संघराज्य मानत नाही”, अशी प्रक्षोभक विधाने केली होती. या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येऊ लागला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यातील विविध जिल्ह्यात एकाच वेळी ऐवढे मोठे मोर्चे कसे निघालं?” – फडणवीस

News Desk

भांड्याला भांड लागणारच, आम्ही समन्वयातून मार्ग काढू ! राऊतांच्या संतापानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

News Desk

उमेदवारांच्या खर्चाची तपासणी प्राप्तिकर आणि विक्रीकर अधिकारी तपासणार

News Desk