HW News Marathi
देश / विदेश

‘तब्बल १४ किमी पायी चालत राहुल गांधी वैष्णोदेवीला पोहोचले’

काश्मीर | काँग्रेस नेते राहुल गांधी चक्क पायी वैष्णोदेवीला गेले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर असून गुरुवारी ते पायी चालत वैष्णोदेवी मंदिरात पोहोचले. काँग्रेसने व्हिडीओ शेअर केला असून यावेळी राहुल गांधी वैष्णोदेवीच्या दिशेने चालताना दिसत आहेत. घामाने भिजलेल्या राहुल गांधी यांच्याभोवती यावेळी सुरक्षारक्षकांचा कडक पहारादेखील होता. दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्ते हातामध्ये पक्षाचा झेंडा घेऊन उभे असल्याचं दिसत आहे.

कोणतंही राजकीय भाष्य करायचं नाहीये

राहुल गांधी यात्रेवर असताना त्यांनी आपण कोणतंही राजकीय भाष्य करणार नसल्याचं सांगितलं. “मी येथे देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि प्रार्थनेसाठी आलो आहे. मला कोणतंही राजकीय भाष्य करायचं नाहीये,” असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

पण राजकीय परिस्थिती अशी होती की….

राहुल गांधी यांना गेल्या अनेक वर्षांपासून वैष्णोदेवीला भेट द्यायची होती अशी माहिती काँग्रेसचे जम्मू काश्मीरमधील प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर यांनी दिली आहे. “आम्ही गेल्या तीन वर्षांपासून राहुल गांधींना विचारणा करत होतो. त्यांनाही यायचं होतं, पण राजकीय परिस्थिती अशी होती की ते दौरा करु शकत नव्हते,” अशी माहिती गुलाम अहमद मीर यांनी दिली आहे.

राहुल गांधींची वैष्णोदेवीला पायी चालत जाऊन आरतीमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती असंही त्यांनी सांगितलं. “दुसऱ्या दिवशी ते पुन्हा पायी चालत खाली उतरणार आहेत. त्यांची वैष्णोदेवीवर भक्ती आहे, यामुळेच आम्ही दौऱ्याच्या पहिल्या दिवशी कोणताही राजकीय कार्यक्रम ठेवला नाही,” अशी माहितीही त्यांनी दिली.

जम्मू काश्मीरनंतर राहुल गांधी लडाखचा दौरा करणार आहेत. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द केल्यानंतर राहुल गांधींचा हा दुसरा दौरा आहे.

आजची काँग्रेस म्हणजे नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी

“आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय.” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. तसेच, विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावरून मतभेद आहेत.

शरद पावार म्हणाले, “मला प्रशांत किशोर यांची मदत घ्यायची कोणतीच गरज नाही. तसंच सध्या मला सत्तेत बसण्याचीही कुठली महत्त्वाकांक्षा नाही. पण विरोधी पक्षांमध्ये समन्वयाचं राजकारण घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करेल”

‘मुंबई तक’शी पवारांनी काँग्रेसला हे खडे बोल सुनावले. इंडिया टुडे ग्रुपचं मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या ‘मुंबई तक’च्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त पवारांची दीर्घ मुलाखत घेण्यात आली. राजदीप सरदेसाई आणि साहिल जोशी यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्र तसंच देशभरातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. ठाकरे सरकार किती वर्ष चालणार, देशात महाराष्ट्राचा प्रयोग होणार का या प्रश्नांसोबतच त्यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीवर परखड भाष्य केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री पलाणीस्वामींनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

News Desk

केंद्र सरकारचे एक पाऊल मागे

News Desk

बॉम्बस्फोटात 24 ठार, 42 जखमी

News Desk