HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस आहे म्हणून महाराष्ट्रात सत्ता आहे! – अशोक चव्हाण

मुंबई | महाविकासआघाडीमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहोत. यामुळे आमचे सरकार मजबूत राहावे, हीच आमची प्रमाणिक भूमिका असल्याचेही काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. चव्हाणांनी जालना जिल्ह्यातील मंठा नगरपंचायचीच्या प्रचार सभेत बोलताना म्हटले आहे.

चव्हाण म्हणाल, “राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांचा जीव वाचवण्यासाठी मेहनत घेत आहोत. हे वेगळे सांगाण्याची गरज नाही. या सर्व कामांवर महाविकासघाडी सरकार लक्ष केंद्र करून राज्याच्या विकासाचा गाडा पुढे चालवित आहे. राज्यात महाविकासआघाडीमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे. हे तुम्हाला मुद्दामून सांगितले पाहिजे.

भाजप देशातील आरक्षण संपविण्याचा प्रयत्न करते

सध्या महाविकासआघाडीचे सरकार मजबूत असून ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर राज्य सरकार निराश झाल्याचेही चव्हाणांनी यावेळी सांगितले. तसेच भाजपला आपल्या देशातील आरक्षण संपवायचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने ५० टक्क्यांची अट न काढता अधिकार राज्यांना दिले असते. संसदेत कायदा केला असता तर मराठा आरक्षण मार्गी लागला असता. मात्र, केंद्र सरकारला ५० टक्क्यांच्या वर आरक्षण द्यायचेचे नाही,” असे अशोक चव्हाण यांनी म्हटले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अधिकाऱ्यांनी मला न विचारताच निर्णय घेतला”, आपल्याच खात्यावर विजय वडेट्टीवारांची नाराजी!

News Desk

कडक लॉकडाऊनची वेळ येणार नाही – उद्धव ठाकरे

News Desk

नैतिकदृष्ट्या गृहमंत्री पदावर राहणे योग्य वाटत नाही – अनिल देशमुख

News Desk