HW News Marathi
महाराष्ट्र

नैतिकदृष्ट्या गृहमंत्री पदावर राहणे योग्य वाटत नाही – अनिल देशमुख

मुंबई | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणी गोळा करायला सांगितल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं. दरम्यान, आज (५ एप्रिल) या प्रकरणावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला असून परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर असून हे प्रकरण CBI कडे वर्ग करण्यात आले आहे. आज गृहमंत्री पदाचा राजीनामा घेऊन अनिल देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार आहेत आणि सुपुर्द करणार आहेत.

अनिल देशमुख यांनी त्यांचा राजीनामा ट्विट करत मुख्यमंत्र्यांना त्यांनी लिहिलेलं पत्रही त्यांनी जोडले आहे. यात अनिल देशमुख यांनी असं लिहिलं आहे की, ‘मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये ५ एप्रिल २०२१ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्या अनुषंगाने मी गृह पदावर राहणे मला नैतिक दृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वत:हून या पदापासून राहण्याचा निर्णय घेत आहे’, असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे.

 

काय लिहिले होते पत्रात?

परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. जवळ जवळ आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली आहे. अनिल देशमुख यांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून असे मिळून १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असं या पत्रात म्हटलं आहे. प्रत्येक महिन्याला ही वसूली करण्याचं वाझेंना टार्गेट देण्यात आलं होतं, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ स्वीकारण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

Aprna

शरद पवारांनंतर तुमचं काय स्थान राहील ते विचारावं, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना सवाल

News Desk

शेतकरी-शेतमजूरांच्या पाल्यांसाठी शुभमंगल योजना

News Desk