HW News Marathi
महाराष्ट्र

“काँग्रेसमध्ये रोज लाथा बुक्क्यांचा मार”- आशिष शेलार

मुंबई | नारायण राणे -हितेंद्र ठाकूर भेटीबद्दल पत्रकारांनी विचारले असता शेलार म्हणाले, राजकारण्यांच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात. आणि त्या प्रत्येक गोष्टीत राजकारणच बघितलं पाहिजे असं ही नसतं. नारायण राणे यांनी जे केले ते राजकारणाचा सुसंस्कृत भाग आहे. काँग्रेसची अवस्था या केबिनेटमध्ये इतकी वाईट आहे, की रोज लाथा बुक्क्यांचा मार खावा लागत आहे. स्वाभिमान नावाचा अवयव ज्यांच्या शरीरात उरलेलाच नाही तो पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष. मिळेल तेंव्हा लाथ मारा हा प्रकार राष्ट्रवादीने सुरू ठेवला आहे. समन्वयशी कोणता संबंध नाही आणि महाराष्ट्राचा विचक्या करत आहे ते म्हणजे महाविकास आघाडी सरकार..अशी घणाघाती टिका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

जिन्नाने फाळणी केली त्यात दुमत असण्याचं कारणच नाही

संजय राऊत यांनी किती ही प्रयत्न केला तरी काँग्रेसचा या देशाचा वेगळा इतिहास लिहण्याच्या प्रयत्नांना बळ देत आहेत. जिन्नाने फाळणी केली त्यात दुमत असण्याचं कारणच नाही आणि गोळीबारी किंवा खून याचा समर्थन करण्याचा प्रश्नच नाही विपर्यासाच विच्छेदन करून सत्याला लपवता येत नाही. संजय राऊत या देशात फाळणीच्या ज्या कटू आठवणी या देशातील नागरिकांना आहेत. त्या लपवण्याचा काँग्रेसच्या प्रयत्नांना तुम्ही विपर्यास करून प्रयत्न करतात. या पलीकडे काही नाही. आपली मालमत्ता साधन संमती ज्यांना सोडून यावं लागलं. आपल्या लोकांचा अंतिम संस्कार सुद्धा ज्यांना करता आले नाही.त्या भारतीय लोकांच्या फाळणीच्या आठवणींना इतिहासातून धडा घेऊन एक नवा इतिहास घडवण्यासाठीचा तो दिवस मोदींनी घोषित केले तर पाकिस्तानच्या पोटात दुखायला लागलं आणि आणि त्याच भावना संजय राऊत रुपी संपादकाच्या हातातून सामनात उतरू लागल्या आणी त्यामुळेच सामनाने आता आपलं नाव बदलून पाकिस्तान नामा किंवा बाबरनामाँ करावे.

एकनाथ शिंदे सारख्या वरिष्ठ नेत्याला संपूर्ण निर्णय करण्याचा अधिकार आहे. शहरांचा सुनियोजित विकास झालाच पाहिजे. परंतु नगर विकास खात्यामध्ये साधा सुनियोजितपणा नाही. पर्यावरणमंत्री MMRDA, सिडकोचे निर्णय घेतात ते आम्हाला दिसतंय. सुपर सी एम ची पद्धत सुरू झाली आहे. त्याची आम्हाला चिंता आहे. शिंदेंजीची घुसमट होत असेल आणि त्यांनी राणेजींच्या कानात काही सांगितलं असेल तर त्यावर मी भाष्य का करावं. असा टोला शेलारांनी एकनाथ शिंदेंनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनाथांचा नाथ म्हणून पुढे या, कोरोनामुळे पालक गमावलेल्या 100 मुलांचं पालकत्व फडणवीसांनी स्वीकारलं

News Desk

राज्य शासन शिक्षकांच्या वाढीव अनुदानाचा प्रश्न सोडविणार! – दीपक केसरकर

Aprna

राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक

Sanjay Jog