HW News Marathi
महाराष्ट्र

कॉंग्रेस नेते शरद पवारांच्या दरबारी!

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीत कुरबुरी सुरू असल्याचं दिसून येत आहे. याचं कारण म्हणजे कॉंग्रेस देत असलेला स्वबळाचा नारा आणि त्याहूनही महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेली टीका. त्यामुळे आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचं चित्रं असतानाच काँग्रेस नेत्यांनी आज (१३ जुलै) शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे सुद्धा पवारांच्या भेटीला आल्याने या भेटीत महाविकास आघाडीतील कुरबुरीवर चर्चा झाल्याची चर्चा अधिक रंगली आहे.

आज संध्याकाळी काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी एच. के. पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज पवारांच्या निवासस्थानी जाऊ त्यांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही नेत्यांनी पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर महाविकास आघाडीतील कुरबुरीवर चर्चा केली. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबतही चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्याशिवाय केंद्र सरकारने नवं सहकार खातं निर्माण केलं आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून दिली जात आहे.

आरक्षणावर चर्चा?

या बैठकीत मराठा आणि ओबीसी आरक्षणावरही चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. राज्य सरकारने विधानसभेत मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे ठराव मंजूर केले आहेत. हे ठराव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. त्यावरही अशोक चव्हाण यांनी पवारांचा सल्ला घेतल्याचं सांगितलं जात आहे. आता शरद पवारांच्या दारी कॉंग्रेसचे नेते गेल्याने काय होणार हे पाहणे महत्वाचे असणाऱ आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंना भाजमध्ये सशर्त प्रवेश ?

News Desk

महात्मा ज्योतिबा फुले यांचे ‘शेतकऱ्यांचे आसूड’ हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल! – उद्धव ठाकरे

Manasi Devkar

“स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, त्याचं काय झालं”, थोरातांचा फडणवीसांना सवाल

News Desk