HW News Marathi
महाराष्ट्र

पक्ष जी जबाबदारी देईल ती यशस्वीपणे पार पाडू – नाना पटोले 

मुंबई | भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकासआघाडी सरकारचा प्रयोग केला. त्यानंतर निवडणुकीत महाविकासआघाडी एकत्र असली पाहिजे अशी भूमिका तिन्ही पक्षाचे नेते घेत असताना महाराष्ट्रात काँग्रेसचे नवे होऊ घातलेले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र स्वबळाचा नारा दिला आहे. नाना पटोले हे सध्या विधानसभा अध्यक्ष आहेत.

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद आणि विधिमंडळ पक्षाचे नेते ही दोन्ही पदं आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्या कोणत्या तरी नेत्याला देण्याच्या हालचाली सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले हे कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची चर्चा आहे. पण, या पदाची जबाबदारी मिळण्याआधीच नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या एकत्र येण्याच्या भूमिकेशी विपरीत भूमिका मांडली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी सांगितलं की, “आमच्या पक्षात जे काही संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आहेत ते राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहेत. जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष बळकट करण्यासाठी आणि पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्राला पुन्हा वैभव मिळवून देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल”.

नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्याला पक्ष जी जबाबदारी देईल ती यशस्वीपणे पार पाडू आणि पक्षाला स्वबळावर सत्तेत आणण्याचं काम केलं जाईल, असं विधान केलं आहे. महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांनी हे सरकार अनेक वर्षे टिकेल असे दावे केले होते. पण, सरकार येऊन एक वर्ष झालं नाही तर काँग्रेस मध्ये स्वबळावर सत्ता येण्याचा नारा आत्ताच देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेजबाबदार वागू नका, स्वत:चा, कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका, अजित पवारांचे आवाहन

News Desk

‘गो ब्राह्मण प्रतिपालक’ एवढं जिव्हारी का लागलं – शरद पवार

News Desk

‘औरंगाबाद’ जिल्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्यामागे कारण काय?

Manasi Devkar