HW News Marathi
देश / विदेश

“बेळगावमध्ये शिवरायांचा पुतळा काँग्रेस नेत्याने हटवलाय, शिवसेना राजीनामा देणार का ?”

मुंबई | “डांबरचोर उदय सामंत कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा काँग्रेसचे नेते सतीश जारकीहोळी यांनी हटवला आहे आणि त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून हा डांबरचोर सत्तेत आहे. हिंमत असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा दे. जय शिवराय!!!”, असे ट्विट करत भाजपच्या निलेश राणेंनी आज (९ ऑगस्ट) राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यावर अत्यंत टोकाची टीका केली आहे. बेळगावामधील मनगुत्ती गावातून ७ ऑगस्टच्या एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हटवण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर राज्यातील शिवभक्तांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

“कर्नाटक बेळगावमधील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळाच्या अनावरणावरून काहीसा गोंधळ झाल्याने काँग्रेस आमदार सतीश जारकीहोळी यांच्या सांगण्यावरून तो पुतळा हटवण्यात आला”, असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर निलेश राणेंनी उदय सामंत यांना “हिंमत असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा दे” असे आव्हान दिले आहे. मात्र, निलेश राणेंच्या या आरोपामागचे कोणतेही सत्य अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, कर्नाटकमधील या प्रकारावर स्वतः राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकला दणका, भारताकडून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर २००% कस्टम ड्युटीत वाढ

News Desk

शोपियानमध्ये ५ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

सुनंदा पुष्कर प्रकरणात शशी थरुर यांना जामीन मंजूर

News Desk