HW News Marathi
महाराष्ट्र

…आणि ‘रॉबर्टसेठ’चा दणदणीत पराभव झाला ! | सचिन सावंत

मुंबई | महाविकास आघाडी सरकारला भारतीय जनता पक्ष हा अमर, अकबर, अँथनीचे सरकार म्हणून हिणवत होता. अमर, अकबर, अँथनी जसा हिट चिटपट होता तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे कॉम्बिनेशन हिट झाल्याचे विधान परिषदेच्या आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. या अमर, अकबर, अँथनीनेच रॉबर्ट शेटचा दणदणीत पराभव केलेला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

विधान परिषदेच्या निकालावर प्रतिक्रीया देताना सचिन सावंत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या रुपाने लोकशाही समोर मोठे संकट उभे आहे. यातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. देशहितासाठी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. यातूनच महाराष्ट्राला एक स्थिर सरकार दिले गेले असून आजचे निकाल हे या तीन पक्षाच्या एकोप्याचे फळ आहे. भाजपाचे १०५ आमदार कामी आले नाहीत. एक जागा मिळाली तीही पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्यामुळे. मस्तवालपणात वागणाऱ्या भाजपासाठी ही मोठी चपराक असून दोन दिवसांपूर्वीच १०५ चे १५० होतील अशा वल्गना करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा भ्रमाचा भोपळा या निकालामुळे फुटला आहे, असा टोला सावंत यांनी लगावला आहे.

अमर, अकबर, अँथनीने, रॉबर्ट शेटचा पराभव केला !

अमर, अकबर, अँथनीने, रॉबर्ट शेटचा पराभव केला असून भाजपाच्या परतीचा पराभव सुरु झाला आहे हे मात्र नक्की, असेही सावंत म्हणाले. भाजपाला आता भविष्यातील नामुष्की स्पष्ट दिसत असल्याने ऑपरेशन कमळला आता वेग येईल व ईडी, इन्कमटॅक्ससारख्या यंत्रणांना चवताळून मविआ नेत्यांवर सोडले जाईल, असे सावंत म्हणाले. मागील १ वर्षापासून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र द्रोहाचे काम करत आहे. पत्रकार अर्णब गोस्वामी, अभिनेत्री कंगणा राणावत यांच्याबरोबर हा पक्ष वाहवत जात होता. हे लोक महाराष्ट्राचा अवमान करताना कोणतीही तमा बाळगत नव्हते. सुशांतसिह राजपूत प्रकरणात मुंबई पोलीसांची मानहानी केली गेली. मुंबईची पाकिस्तानशी तुलना करणाऱ्या कंगना राणावतला भाजपा नेते झाशीची राणी म्हणत होते. महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा अवमान सातत्याने केला जात होता, तो रागही या निवडणुकीच्या निकालातून व्यक्त झालेला दिसला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी नगरसेवक झाल्यानंतर बाबरी पाडायला गेलो “, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तर

Aprna

मोदींचे मीठ खाऊन शिवसेनेने कर्जमाफीला‘जय महाराष्ट्र’ केला! विखे पाटील

News Desk

शिवसेनेचे हिंदुत्व हे भेंडीबाजारातले; सामनाच्या अग्रलेखावरून नितेश राणेंची टीका

Aprna