HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसचे ११ आमदार उपोषणाला बसणार !

जालना | भाजपाची साथ सोडत महायुतीमधून शिवसेना बाहेर पडली आणि शिवसेनेने, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. यानंतर मात्र, या आघाडीतील पक्षांमध्ये पहिल्या काही महिन्यातच नाराजीचे सूर बाहेर येऊ लागले होते. भाजपाने तर या सरकारवर निशाणा साधण्याची कोणतीही संधी न सोडता ‘हे सरकार फार काळ टिकणार नाही’, असा अंदाज लावला होता.

आता, काँग्रेसचे ११ आमदार उपोषणाला बसणार असल्याचे समजत आहे. याप्रकरणी जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत उभी फूट निर्माण होत असून काँग्रेसचे तब्बल ११ आमदार नाराज असल्याचे समोर येत आहे. निधी वाटपाबाबत दुजाभाव होत असल्याचे कारण त्यांनी दिले आहे.

तसेच, याआधी राज्यातील पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर देखील सदर विषय घातल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आम्हाला अद्याप न्याय न मिळाल्याची खंत आमदार गोरंट्याल यांनी व्यक्त केली असून लवकरच सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर, आमदार कैलास गोरंट्याल हे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे जानेवारी महिन्यातच समोर आले होते, त्यावेळी ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाना उधाण आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे. चला, हवा येऊ द्या! सामनातून भाजपला इशारा

News Desk

‘४५ हजार कृषी विद्यार्थ्यांना दिलासा,’ दादा भुसेंची महत्वाची माहिती!

News Desk

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील हुतात्मा वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

News Desk